TheClearNews.Com
Tuesday, June 24, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सावधान इंडिया !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 17, 2020
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

डॉ. विनय काटे : मीडियातल्या बातम्यांवर जर लक्ष दिलं हे ध्यानात येईल की चीन भारताशी युद्ध करायच्या तयारीत आहे. चीनने लडाखमध्ये मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं आहे. दुर्दैवाने हे युद्ध झालं तर त्यात जी आर्थिक धूळधाण होईल ती सहन करायच्या स्थितीत सध्या भारत नाहीये, जीवितहानी तर वेगळीच असेल. पाकिस्तान, चीन, नेपाळ, बांग्लादेश आणि श्रीलंका या सगळ्या शेजारी देशांशी आपले राजनैतिक संबंध सध्या अत्यंत वाईट आहेत. आणि ही संधी चीन किंवा पाकिस्तान सोडणार नाही, कारण भारतीय उपखंडात चीनला स्वतःचा वरचष्मा दाखवायला याइतकी मोठी संधी नाही.

 

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

चीनने भारताशी युद्ध पुकारले तर अमेरिका त्यामध्ये मोठी मध्यस्थी करणार नाही, कारण तिकडे राष्ट्रपतीपदाची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. आणि जरी चुकून अमेरिकेने काही हस्तक्षेप केला तरी तो फुकट नसेल, त्याबदल्यात अमेरिका भारताकडून त्याचा आर्थिक मोबदला या ना त्या प्रकारे काढून घेईलच. अमेरिका कुठलेही युद्ध फुकटात किंवा तोट्यात जाण्यासाठी करत नाही हा इतिहास आहे. वरून अमेरिकेची सोबत घेतल्यास चीन आपला कायमचा शत्रू बनून जाईल ज्याची आणि आपली सीमा एक आहे.

अर्थव्यवस्थेचं बोलायला गेलं तर गेल्या तिमाहीत -24% चा विकास (?) दर नोंदवून आपण हलाखीत चाललो आहोत हे स्पष्ट आहे. बऱ्याचशा रेटिंग एजन्सीचा अंदाज आहे की सध्याची परिस्थिती आहे तशी राहिली तरी वर्षाअखेर आपला विकासदर -10% ते -14% या घरात कुठेतरी असेल. 2024 ला 5 ट्रीलीयनची इकॉनॉमी बनणे सोडा, आपण महागाई वजा करता गेल्या वर्षीच्या GDP च्या आकड्यावरच असू अशी लक्षणे आहेत. आणि यात जर चीनसोबत युद्ध आणि अमेरिकेत सत्ताबदल या दोन गोष्टी घडल्या तर आपली आर्थिक अवस्था भयानक असेल.

भारतातल्या मंदीचा सगळ्यात मोठा फटका इथल्या गृहनिर्माण उद्योगाला बसला आहे, जिथे सगळ्यात जास्त रोजगार आहे. गेल्या 5 महिन्यात संघटीत क्षेत्रांत 2 कोटी नोकऱ्या गेल्या आहेत. असंघटित क्षेत्रांतली परिस्थिती तर अजूनच वाईट आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाणे आणि पगारकपात होणे लाखो घरांचे EMI थकवू शकते आणि ती घरे बँकाकडून लिलावात निघू शकतात. बाजारात ग्राहक नसल्याने बँकांना त्यांचा पैसा परत मिळणार नाही आणि त्यातून बँका बुडण्याची भीती आहे. 2008 ला अमेरिकेत जे झालं ते आपल्याकडे यावेळेस होण्याची शक्यता खूप मोठी आहे.

कोरोनाच्या वाढीचा वेग पाहता भारतात पुढच्या आठवड्यापासून दररोज लाखभर नवीन केसेस यायला सुरू होतील. आणि हा आकडा उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. आताच आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये बेड शिल्लक नाहीयेत, त्यामुळे येत्या काळात तर परिस्थिती अजूनच वाईट होणार आहे.

बाहेरून आक्रमण आणि आतून आर्थिक दुरावस्था अशा दुहेरी संकटात आपण अडकलो तर आपल्याला आणीबाणीची परिस्थिती पाहावी लागेल. कदाचित सरकार ती आणीबाणी जाहीर करेलही आणि आपले आर्थिक हक्क नाकारून बाहेरचे आक्रमण परतवून लावण्याला प्राधान्य देईल. दुर्दैवाने असं काही घडलं तर लक्षात ठेवा की यासाठी कोरोना जबाबदार नाहीये, तर एक देश आणि नागरिक म्हणून आपल्या चुकीच्या प्राथमिकता जबाबदार आहेत. राजकारण, मंदिर-मशीद, सेलेब्रिटी यांच्यापलीकडे जाऊन एक नागरिक म्हणून आपल्या आरोग्याचे, रोजगाराचे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न दुर्लक्षित केले असल्याने ही वेळ आपल्यावर येणार आहे.
माझ्या प्रिय देशा, सावध रहा! येता काळ खूप भयंकर आहे!!

 

डॉ. विनय काटे यांच्या फेसबुक वॉलवरून साभार

सूचना : या लेखात व्यक्त केले गेलेले विचार लेखकाचे स्वतःचे विचार आहेत. या लेखातील टीका, टिप्पणी, अथवा सत्यतेप्रती ‘क्लिअर न्यूज’ उत्तरदायी नाहीय. या लेखातील सर्व मुद्दे जशीच्या तशी घेण्यात आलेली आहेत. या लेखातील कोणतीही माहिती अथवा व्यक्त करण्यात आलेले विचार ‘क्लिअर न्यूज’चे नाहीत. 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

कांदा निर्यात बंदी म्हणजे शेतकऱ्यांची अवहेलना : गुलाबराव वाघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दररोज १६७ रूपये ‘बचत’ करा अन् ‘करोडपती’ बना !

January 4, 2022

धरणगावात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींच्या निधीस मंजुरी !

July 10, 2024

लखीमपूरमधील वातावरण चिघळलं ; प्रियांका गांधींना अटक केल्याचा काँग्रेस नेत्याचा दावा

October 4, 2021

कांताबाई बियाणी यांना ८२ हजारांचा दंड वसुलीची नोटीस

February 18, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group