जळगाव प्रतिनिधी । रस्त्याच्या मध्यभागी उभ्या ट्रकला रिक्षाची जोरदार धडक लागल्यामुळे एकाचा मृतू झाल्याची घटना सोमवारी रात्री उशिरा घडली.
रविंद्र मधुकर जोशी (वय-४० रा. रामेश्वर कॉलनी) हे नेहमीप्रमाणे १४ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास कामावरून घरी रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ७५०१) ने अंजिठा चौफुलीकडून रामेश्वर कॉलनी येथे जात होते. अचानक रिक्षा हॉटेल त्रिमुर्ती जवळ रस्त्याच्या मध्यभागी उभा असलेल्या ट्रक क्रमांक (एमएच ४१ जी ५२२९) वर आदळली. यात चालकासह रविंद्र जोशी हे गंभीर जखमी झाले होते. जोशी यांना देवकर कॉलेज शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू वैद्यकिय अधिकारी डॉ. अतुल पाटील यांनी त्यांना मृत घोषीत केले. दरम्यान याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे. परंतू असून ट्रक चालक फरार झाला आहे.