जळगाव (प्रतिनिधी) देशातील अल्पसंख्याक समुदायाकरिता केंद्र सरकारच्या १५ सूत्री कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील पोलीस भरतीमध्ये अल्पसंख्यांक तरुणांना विशेष प्राधान्य द्यावे व निवड समितीमध्ये सुद्धा त्यांचे प्रतिनिधी ठेवावे, अशी मागणी मनसे जळगांव जिल्हा सचिव व मनसे शॅडो कॅबिनेट सदस्य अॅड. जमील देशपांडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली आहे.
अॅड. जमील देशपांडे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केलेल्या मागणीचा आधार हा देशातील अल्पसंख्याक समुदायाकरिता केंद्र सरकारच्या १५ सूत्री कार्यक्रमानुसार आहे. १५ सूत्री कार्यक्रमात केंद्राने म्हटले आहे की, राज्य सरकारांना हा सल्ला दिला जाईल की पोलीस भरतीवेळी अल्पसंख्यांक समुदायातील उमेदवारांना विशेष प्राधान्य देण्याबाबत विचार केला जावा. यासाठी निवड समितीत त्यांचा एक प्रतिनिधी नेमावा. अगदी केंद्र सरकार देखील केंद्रीय पोलीस दलामध्ये कर्मचारी भरती दरम्यान याच पद्धतीचे मार्गदर्शक तत्व अवलंबणार आहे. दरम्यान, राज्य पोलीस दलात अधिकाधिक अल्पसंख्याक तरुण-तरुणीची निवड होण्याच्या दृष्टीने त्यांना पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण देण्यात असते. परंतू अल्पसंख्याक समुदायाला प्राधान्य दिल्यास पोलीस दलातील त्यांचा सहभाग वाढेल, असेही जमील देशपांडे यांनी म्हटले आहे.