जळगाव,दि. १ :- प्रसंग होता महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा. महावितरणमध्ये आंतरराष्ट्रीय कामगार दिनही मोठ्या जल्लोशात साजरा करण्याची पध्दत आहे. त्यादिवशी गुणवंत कामगारांना समारंभपूर्वक गौरविण्यात येते. जळगाव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यांचा समावेश असणाऱ्या जळगाव परिमंडलातून सुमारे साठ-बाषष्ठ तांञिक वीज कामगारांची गुणवंत म्हणून झालेली निवड.. त्यामुळे तितक्या किंवा त्याहूनही अधिक वीज कर्मचाऱ्यांचा जथ्था कार्यक्रमस्थळी उपस्थित राहाणं ओघानंच आलं.¬¬. साधारणत: तीनआडीचशे अधिकारी-कर्मचारी तिथं होते. कार्यक्रमाच्या त्या साऱ्या गराड्यात मुख्य अभियंता कैलास हुमणे साहेब माञ प्रचंड उत्साही दिसत होते. त्यांच्यात वेगळीच ऊर्जा संचारलेली दिसत होती.
कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येलाही त्यांनी प्रत्यक्ष कार्यक्रमस्थळी नियोजित कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची अगदी बारकाईनं पाहाणी करून संयोजकांना काही आवश्यक त्या सुचनाही केलेल्या होत्या. एक मे रोजी सकाळी ध्वजारोहणानंतर कामगार दिनाच्या समारंभास सुरुवात झाली. सभागृहात त्यांची चौकस नजर चोहीकडे भिरभिरत होती. तिथं हजर असणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यांशी आस्तेवाईकपणे ते बोलत होते. प्रत्येकाचा कार्यक्रमात सहभाग वाढवित होते; गैरहजर असणाऱ्यांविषयीही ते चौकशी करीत होते. बहुत्येकांना बोलण्याची, त्यांच्या भावना व्यक्त करण्याची संधी ते उपलब्ध करून देत होते. सांगायचे म्हणजे त्यांच्यात कृतज्ञपणाची भावना वाढलेली दिसत होती.
कार्यक्रम पुढे सरकत होता. अनेकांच्या मनोगतानंतर गुणवंत कामगारांचा सत्कार सुरु झाला. गुणवंत म्हणून निवड झालेल्यांत एकही तांञिक महिला वीज कर्मचारी नसल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. ती बाब त्यांना खटकलीही. त्यावर लागलीच त्यांनी निवड समितीला त्याबाबतची विचारणा करुन समारंभात उपस्थित असलेल्यापैकी एका महिलेचा गुणवंत कामगार म्हणून त्यांनी सत्कारही केला. दरम्यान गुजऱ्या केल्ला पावरा या आदीवाशी भागातील जनमिञासही त्यांनी बोलतं केलं. तो आदीवाशी आणि दुर्गम भागात अगदी प्रतिकूल परिस्थितीत सर्वोत्तम ग्राहक सेवा कशा देतो, त्याची इत्थंभूत माहिती देण्यास त्याला ते प्रोत्साहीत करीत होते. साहेबांच्या सुचनेनुसार पावराही बिनधास्तपणे त्याचे अनुभव सांगत होता. त्याच्याही निवेदनात नैसर्गिकपणा होता. तो हुमणे साहेबांसह सर्वांनाच भावत होता. साहेब खुश होते..
मुख्य अभियंता हुमणे साहेबांचा स्वभाव अत्यंत नेमस्त आणि शिस्तीचा. ते अत्यंत शांत, संयमी सहृदयी सद्ग्रहस्त. शिस्तीचे असूनही त्यांनी कधी कुठं आदळाआपट किंवा धाकदपटशा दाखविल्याचे ऐकिवात नाही. त्यांच्या या स्वभावगुणांमुळेच त्यांचे प्रशासन अगदीच आदर्श असावे. ते शांत नि संयमी असल्यामुळेच त्यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदरयुक्त भिती असावी. त्यांचे कामही त्यामुळेच प्रभावी ठरलेले असावे. विद्युत सेवेतील त्यांचाअनुभवही दांडगा राहिलेला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि आताच्या महावितरणमध्ये तब्बल तेहतीस वर्षांची त्यांची सेवा झाली. या प्रदीर्घ कालावधीत त्यानी अनेक चांगले-वाईट उन्हाळे-पावसाळे अनुभवले आहेत. सोय आणि गैरसोयीच्या बदल्यांसह अनेक मोर्चे आंदोलनांलाही ते सामोरे गेलेले आहेत. कनिष्ठ अभियंता ते मुख्य अभियंता या विविध टप्प्यावर त्यांनी शेकडो वाड्या-पाड्या तुडविलेल्या आहेत. कोणता ग्राहक प्रामाणिक नि कोण अप्रामाणिक याची त्यांना चांगली जाण आहे. कोणता कर्मचारी कामाचा व कोण बिनकामाचा याचीही त्यांना चांगली पारख. त्यामुळे जनमिञ पावरांच्या भाषणावर खुश होऊन अधुन-मधून ते टाळ्याही पिटत होते. त्यांच्यात मोठा उत्साह जाणवत होता..
कार्यक्रम सांगतेकडे झुकत होता. सत्कार संपले होते. शेवटचे अध्यक्षीय भाषण त्यांचेच होणार होते. मुळात, भाषणबाजीपासून स्वत:ला कायम दूर ठेवणारे हुमणेसाहेब कामगार दिनाच्या कार्यक्रमात अत्यंत अमोघरीतीने बोलत होते. प्रतिकूल परिस्थितीतही महावितरणचा कर्मचारी कसा प्रभावीपणे काम करीत अधिकाधिक चांगल्या ग्राहकसेवा देतो, ते सांगतांना ते अगदीच भरावून गेले. ते काही क्षण गहिवरले. त्यांच्या भावना उचमळून येत होत्या माञ कंठ दाटून आलेला. डोळे भरून आलेले. ते पाहून सभागृहाते सारेच हबकले. अचानक पीनड्रॉप सायलेंस निर्माण झाला. अन् त्यांनी अचानक तिथल्या उपस्थित साऱ्या जनमिञांना चक्क थेट सॅल्युटच ठोकला…