चंदिगड (वृत्तसंस्था) प्रसिद्ध रणजीतसिंह हत्या प्रकरणात १९ वर्षांनंतर पंचकुलाच्या विशेष सीबीआय कोर्टाने सोमवारी डेराममुखी गुरमीत राम रहीमसह चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. न्यायालयाने राम रहीमला ३१ लाखांचा दंड ठोठावला. तर इतर चार दोषींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दंडातील अर्धी रक्कम पीडित कुटुंबाला दिली जाईल.
सीबीआयच्या स्पेशल कोर्टात गुरमीत राम रहीम यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्याचबरोबर इतर चार आरोपींना देखील जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. राम रहीम आणि त्यांच्या सहकाऱ्यांना कोर्टात ८ ऑक्टोबरलाच दोषी ठरवण्यात आलं होतं. पण कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. कोर्टाकडून आज निकालाचं वाचन करण्यात आलं. त्याआधी हरियाणाच्या पंचकूला जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच जिल्ह्यात कमल १४४ लागू करण्यात आलं आहे.
नेमकं काय आहे रणजितसिंह हत्या प्रकरण ?
रणजितसिंह यांची १० जुलै २००२ साली हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरु होता. सीबीआयने ३ डिसेंबर २००३ रोजी या प्रकरणी एफआयआर दाखल केली होती. गेल्या १९ वर्षांपासून या प्रकरणावर कोर्टात खटला सुरु होता. अखेर ८ ऑगस्टा या प्रकरणाचा युक्तीवाद संपला. त्यानंतर आज राम रहीमला आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. विशेष म्हणजे याआधी राम रहीमला पत्रकार रामचंद्र छत्रपती यांच्या हत्येप्रकरणी देखील कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
















