मुंबई (वृत्तसंस्था) जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर शनिवारी पहाटे एक बस दरीत कोसळून साखर झोपेतच 12 प्रवाशांचा मृत्यू झाला. तर २५ हून प्रवाशी जखमी झाले आहेत. या खासगी बसमध्ये मुंबईच्या गोरेगाव परिसरातील एक झांजपथक होते. पुण्यातील कार्यक्रम संपवून हे पथक मुंबईच्या दिशेने परत येत होते. यावेळी लोणावळ्यानजीक बोरघाटातील शिंगरोबा मंदिराजवळ हा अपघात झाला.
पुण्याहून मुंबईला ही बस निघाली होती, तेव्हा चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आत्तापर्यंत 25 जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. आणखी आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. अद्याप 15 ते 20 प्रवासी दरीत अडकल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान,मुंबईच्या गोरेगावमधलं बाजी प्रभू झांज पथक या बसमध्ये असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. पुण्याचा कार्यक्रम आटोपून हे पथक मुंबईकडे निघालं होतं. तेव्हा हा अपघात झाला.
दरम्यान, बोरघाटातील खिंडीसारख्या भागातील रस्ता संपवून ही बस पुढे निघाली आणि थेट १५० फूट खोल दरीत जाऊन कोसळली. पहाटे चारची वेळ असल्यामुळे झांजपथकातील जवळपास सर्वजण साखरझोपेत होते. याचवेळी नेमका बसच्या चालकाचाही डोळा लागला असावा आणि त्याचे बसवरील नियंत्रण सुटून बस दरीत कोसळली असावी, असा अंदाज व्यक्त वर्तविला जात आहे.