नशिराबाद प्रतिनिधी (सुनिलमहाजन) येथील नशिराबाद नगरपरिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गापासून ते पाण्याच्या टाकीपर्यंतच्या कॉंक्रिटीकरणाच्या रस्त्यावर खड्डे पडून त्यातील बांधकामाच्या आसार्या बाहेर आल्याने लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
सध्या पावसाळ्याचे वातावरण असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचून त्या पाण्यात आसऱ्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहन चालक व पायी चालणाऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याबाबत नशिराबाद नगरपरिषदेचे दुर्लक्ष झाल्याचे जाणवत असल्यामुळे नशिराबाद येथील सामाजिक कार्यकर्ते व स्वयशोध फाऊंडेशन यांनी क्रांतीदिनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी रवींद्र सोनवणे यांना निवेदन देऊन पुढील आठ दिवसाच्या आत रस्त्याची दुरुस्ती करून नशिराबाद येथील नागरिकांच्या समस्या सोडवावी, असे निवेदनाद्वारे सांगितले. गावातील पिण्याचे पाणी, रस्ते, पथ दिवे ,कचऱ्याच्या संदर्भात चर्चा केली. याचवेळी मुख्याधिकारी साहेबांनी आश्वासन देऊन पुढील काही दिवसात आपली समस्या सोडवण्यात येईल. तसेच ‘नाही’ च्या अधिकाऱ्यांशी बोलून रस्त्याचे काम संदर्भात चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. निवेदन देतांना प्रा. डॉ विश्वनाथ महाजन, सामाजिक कार्यकर्ते हरीश पाटील डॉ. प्रमोद आमोदकर स्वयंशोध फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोलते, नरेंद्र धर्माधिकारी, सौरभ चौधरी, नीरज चितोडे हे उपस्थित होते.