जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी पासून एक कीलोमीटर अंतरावर जळगावहून पहुरकडे जाणाऱ्या चारचाकीने दुचाकीला दिलेल्या धडकेत तीन जण जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी ३ :१५ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत वृत्त असे की, दुचाकीवरील पंकज मोहन तायडे (वय ३२ रा. कला वंसत नगर, आसोदा रेल्वेगेट जळगाव) व धनंजय गंगाराम सपकाळे (वय ४२ रा. स्टेट बँक कॉलनी जळगाव) तर चारचाकी चालक प्रविण प्रकाश पाटील (वय ३८ रा. भराडी ता. जामनेर) या तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. शेंदुर्णी येथुन फॉर्चून फायनान्स या बँकेचे शाखा व्यवस्थापक धनंजय सपकाळे व सेल्स एक्झिक्युटिव्ह पंकज तायडे हे दोन्ही ( एम. एच. १९ डी. आर. १४१९) युनिकॉन या दुचाकीने बँकेचे कामकाज आटोपून जळगावकडे परतत येत असतांना जळगाहुन पहुरकडे जाणाऱ्या चारचाकी (एम. एच. १९ सीयु. ७१६१) दुचाकीला जोरदार धडक पाळधी पासुन एक कीलोमीटर अंतरावर बळीराजा ढाबा जवळ जोरदार दिली. या अपघातात दुचाकीस्वारासह मागे बसलेल्याचे हात व पाय शरीरापासुन वेगळे तुकडे होऊन रस्त्यावर पडले होते. दुचाकीवरील पंकज तायडे व धनंजय सपकाळे हे जागीच ठार झाले. तर चारचाकी चालक प्रविण पाटील याचाही मृत्यू झाला. याप्रकरणी पहूर पोलिसांची पुढील कारवाई सुरू आहे.