जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर मधील ठेवीदारांना आपल्या ठेवी परत मिळाव्यात म्हणून आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करून ठेवीदारांचे प्रशासकीय मंडळ नेमावे अशी मागणी मनसे चे जिल्हा सचिव तथा मनसे शाडो कॅबिनेट सदस्य (गृहखाते) अॅड.जमील देशपांडे यांनी केंद्रीय सहकार मंत्री यांना केली आहे.
आताचा घोटाळा व याची व्याप्ती बघता अनेक वर्षे तपास सुरू राहील ठेवीदार मात्र ठेवी मिळण्यापासून वंचित राहील याबाबत केंद्रीय सहकारमंत्री यांना ई-मेल करून अवगत करण्यात आले आहे. दरम्यान ठेवीदारांना प्रामाणीक पणे ठेवी द्यायच्या असतील तर बीएचआर पतसंस्था एखाद्या मोठ्या सहकारी बँकेत विलीन करावी तरच हा प्रश्न सुटेल अशी सुद्धा मागणी अॅड.जमील देशपांडे यांनी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात महाराष्ट्रातील सर्व बंद पडलेल्या पतसंस्थामधील ठेवीदारांना ठेवी मिळाव्यात म्हणून २०११ साली जनहित याचिका दाखल आहे त्या बाबत सुद्धा पाठपुरावा सुरू असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे असे ऍड जमील देशपांडे यांनी सांगितले आहे.