चाळीसगाव (प्रतिनिधी) ५७ हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सर्व पिकांवर आगाऊ (अॅडव्हान्स) २५ टक्के पीकविमा नुकसानभरपाई मिळणार असल्याची माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली आहे.
मंगेश चव्हाण यांनी सोशल मीडियात टाकलेल्या पोस्टमध्ये पीकविमा योजनेला तळागाळापर्यंत नेणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी, शेतकऱ्यांना १ रुपयात पीकविमा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी प्रशासनाला तातडीने उपाययोजना व दुष्काळाचे अहवाल सादर करण्याचे निर्देश देत दिलासा देणारे ग्रामविकास मंत्री गिरिषभाऊ महाजन यांचे मनापासून आभार, अशा शब्दात भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान, ५७ हजारहून अधिक शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील सर्व पिकांवर आगाऊ (अॅडव्हान्स) २५ टक्के पीकविमा नुकसानभरपाई मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
















