पुणे (वृत्तसंस्था) निवडणूक आयोगाने दूध का दूध आणि पाणी का पाणी केलं आहे.” त्यामुळे आता राज्यातील सर्व लोकसभेच्या जागा जिंगण्यचा आपल्याला निर्धार करायचा आहे, असे म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी 2024 च्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Modi) राजकीय प्रवासाचा आढावा घेणाऱ्या ‘मोदी @ 20’ (Modi @ 20 Book) या पुस्तकाच्या मराठी अवृत्तीचं प्रकाशनाच्या निमित्ताने पुण्यात बोलत होते.
अमित शाह पुढे म्हणाले की, काल युतीला खूप मोठा विजय मिळाला. शिंदेंच्या शिवसेनेला खरी शिवसेना असल्याचं सांगितलं आणि धनुष्यबाण मिळालं. स्वतःपेक्षा मोठा फोटो मोदींचा लावला आणि निवडणूक लढले, आणि मुख्यमंत्री व्हायला विरोधी पक्षाचे तळवे चाटले. जे धोका देतात त्यांना कधी सोडले नाही पाहिजे, अशी टीका अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. इथून बाहेर पडताना मी अपील करतो, लोकसभेत महाराष्ट्रातील सगळी मते भाजप – शिवसेना युतीला पडतील, असेही शाह म्हणाले.
370 हटवला आता काश्मीरमध्ये कुणाची दगड फेकायची पण हिंमत होत नाही. या आधी काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या व्हायच्या. पूलवामामध्ये जे झाले त्यावेळी मोदीजी काहीच बोलत नव्हते. बैठका केल्या नाहीत, आम्हाला वाटले युद्ध होईल पण त्यांनी सर्जिकल स्ट्राईक ( Air Strike Surgical strike) केला. मोदीजी १५-१८ तास काम करतात, भारत सर्वप्रथम व्हावा म्हणून ते काम करतात, असे अमित शाह म्हणाले.
“२००४ ते २०१४ ला कालखंडात युपीए सरकारनं देशात राज्य केलं. युपीए सरकार हे असं सरकार होतं. ज्यात प्रत्येक मंत्री आपल्याला पंतप्रधान मानत होता आणि पंतप्रधानांना कोणी पंतप्रधान मानत नव्हतं. पॉलिसी पॅरालिसिस झालं होतं. पाकिस्तानातून दहशतवादी घुसून आपल्या जवानांचं शिर कापून त्यांचा अपमान करत होतो आणि दिल्लीत शांतता होती. १२ लाख कोटींचे भ्रष्टाचार देशासमोर एकापाठोपाठ आले. पंतप्रधानांनाच विदेशातही सन्मान नव्हता. ते विदेशात लिहिलेलं भाषण वाचत होते. कधी थायलंडचं भाषण सिंगापुरात तर कधी सिंगापूरचं भाषण थायलंडमध्ये. देशाला अपमान सहन करावा लागला. तेव्हा मोदींच्या नावाची घोषणा झाली आणि निवडणुका लाटेत बदलल्या. तेव्हा भाजपला पहिल्यांदा संपूर्ण बहुमत मिळालं,” असं अमित शाह म्हणाले.