TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘आंदोलनजीवीं’नी शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम केलं : पंतप्रधान मोदी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) शेतकरी गरिबीत चाचपडत राहो, असे कोणालाही वाटत नाही. देशाचं सामर्थ्य वाढवण्यात सर्वांचे योगदान, या देशभरात टोल प्लाझा ही सर्वांनी स्विकारलं आहे. सर्व राज्यात टोल प्लाझा आहे. शेतकऱ्यांच्या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचं काम ‘आंदोलनजीवीं’नी केलं. त्यांच्यापासून देशाला वाचवणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या आभारप्रदर्शनावर धन्यवाद प्रस्ताव सादर केला. या दरम्यान काँग्रेस खासदार सभात्याग करत सभागृहातून बाहेर पडले. मोदींच्या भाषणादरम्यान ८ वेळा गदारोळ झाला आहे. सहाव्या वेळी झालेल्या गदारोळानंतर मोदी संतापले. काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांना म्हणाले की, हे जरा जास्तच होतंय, मी तुमचा आदर करतो. कृषी कायद्यांविषयी बोलताना मोदींनी पुन्हा एकदा आंदोलनजीवीचा मुद्दा छेडत विरोधकांवर निशाणा साधला. शेतकऱ्यांचे आंदोलन पवित्र असल्याचे मी मानतो. पण, शेतकऱ्यांच्या या पवित्र आंदोलनाला अपवित्र करण्याचे काम हे आंदोलनजीवी करत आहेत. त्यांच्यापासून देशाला वाचवणे आवश्यक आहे, असे मोदी म्हणाले.

READ ALSO

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

पंतप्रधान मोदी कृषी कायद्यांवर बोलताना म्हणाले की, ‘या कोरोना काळात ३ कृषी कायदे देखील आणले. कृषी सुधारणेची ही प्रक्रिया अत्यंत महत्वाची आहे. वर्षानुवर्षे आपल्या शेती क्षेत्राला आव्हानांचा सामना करावा लागत होता, त्यातून सावरण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. भविष्यातील आव्हानांना देखील आपल्याला सामोरे जावे लागेल. मी पाहत होतो की, येथे काँग्रेसच्या सहकार्यांनी चर्चा केली की ते कायद्याच्या रंगावर तो काळा आहे की पांढरा यावर वाद घालत होते. त्यांनी कंटेंटवर चर्चा केली असती तर बरे झाले असते. जेणेकरून देशातील शेतकऱ्यांपर्यंत योग्य माहिती पोहोचली असती.’

यावेळी काँग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांनी मोदींच्या भाषणावेळी मध्ये मध्येच बोलायला सुरुवात केली. यावर मोदींनी भाषण थांबविले आणि खाली बसले. लोकसभा अध्यक्षांनी चौधरींना समजावल्यानंतर मोदी पुन्हा उभे राहिले. मात्र, पुन्हा बोलू लागताच चौधरींनी पुन्हा बोलण्यास सुरुवात केली. यावर मोदींनी तुमचे म्हणजे रजिस्टर करण्याची संधी मिळाली आहे. तुम्हाला आणखी काही बोलायचेय का असे विचारले. यावर चौधरी यांनी माईक बंद केलाय मग कसे बोलणार अशी तक्रार केली. यावर साऱ्या सभागृहात हशा पिकला. यानंतर पुन्हा मोदींनी बोलण्यास सुरुवात करताच चौधरींनी त्यांना पुन्हा थांबविण्यास सुरुवात केली. हे पाहून मोदी संतापले. अधीर रंजन जी आता अती होत आहे. मी तुमचा आदर करतो. तुम्हाला बंगालमध्ये तृणमूलपेक्षा जास्त प्रसिद्धी नक्की मिळेल, काळजी करू नका. हे चांगले दिसत नाहीय. तुम्ही असे कधी वागत नाही, आता का वागताय, असा सवाल केला. तसेच राज्यसभेत काँग्रेसचे काय वेगळेच चाललेय आणि लोकसभेत काही वेगळेच अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसची खिल्ली उडविली.

यावेळी कृषी कायद्यांची बाजू मांडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काँग्रेसच्या खासदारांकडून सातत्याने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न सुरु होता. तेव्हा संतापलेल्या नरेंद्र मोदी यांनी भर लोकसभेत काँग्रेसवर निशाणा साधला. काँग्रेस पक्ष धड स्वत:चं भलं करु शकत नाही आणि देशाचंही भलं करू शकत नाही, अशी टीका मोदींनी केली. देशातील सर्वात जुना पक्ष असलेला काँग्रेसमध्ये सध्या दुफळी आणि संभ्रमाचे वातावरण आहे, असेही ते म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
Next Post

कुसूंबा येथे बैठक हॉल जवळ उभी असलेली दुचाकी लांबविली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भंडारा अग्नी तांडव प्रकरण : दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा करा : देवेंद्र फडणवीस

January 9, 2021

अल्पवयीन मुलीचा विनयभंग ; अल्पवयीन मुलाविरुद्ध शनिपेठ पोलिसात गुन्हा !

March 8, 2023

स्व. कांताई जैन यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त ५१६ सहकाऱ्यांनी केले रक्तदान !

September 7, 2023

राज्य सरकार मोठा निर्णय : महिलांना मिळणार 3 मोफत सिलिंडर !

July 31, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group