धरणगाव (प्रतिनिधी) राज्यशासनाच्या माझी वसुंधरा अभियानामध्ये धरणगाव नगरपरिषद सहभागी झालेली असून या अभियानामध्ये पर्यावरणातील आकाश, वायू, जल, अग्नी, जमीन या पंच तत्वांचे संरक्षण व संवर्धन करणेसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच दर महिन्याच्या १ तारखेला वाहनांचा वापर टाळून नो व्हेईकल डे पाळण्यात यावा. असे आवाहन नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
सद्यस्थितीत हवेच्या गुणवत्तेवर परिणाम करून हवा प्रदूषणास प्रोत्साहन देणाऱ्या वाहनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खालावत आहे. या पार्श्वभूमीवर दि. ०१ जानेवारी २०२१ रोजी नववर्षानिमित्त संकल्प करून दर महिन्याच्या १ तारखेला वाहनांचा वापर टाळून नो व्हेईकल डे पाळण्यात यावा. असे आवाहन नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.