जळगाव (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची स्वायत्त बाजारपेठ कशी उभी राहिल शेतकऱ्यांना चांगल्या पध्दतीने शेतीमाल कशा पध्दतीने विकता येईल यासाठी प्रयत्नशील राहिल. कारण शेतकरी असल्याने शेतीची नाळ आजही कायम असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शहरातील काव्यरलावली चौकात सोमवारी पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते बळीराजाच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ना. पाटील म्हणाले की, शेतकरी हाच जगाचा खरा पोशिंदा. बळीरागामुळे आज जगाला अन्न धान्य मिळते आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची स्वायत्त बाजारपेठ कशी उभी राहिल. शेतकऱ्यांना चांगल्या पध्दतीने शेतीमाल कशा पध्दतीने विकता येईल. यासाठी प्रयत्नशील राहील, अशी ग्वाही पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी दिली. यावेळी आमदार राजुमामा मोळे, महापौर भारतीताई सोनवणे, माजी आमदार प्रा. चंदकांत सोनवणे, परिवर्तन संस्थेचे शंभु पाटील, मजुर फेडरेशनचे पुरुषोत्तम चौधरी, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष एम पवार, सुरेश पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, शंभु सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, जि.प. सदस्य रविंद्र नाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी महानगराध्यक्ष नामदेवराव चौधरी, मुकुंद सपकाळे, ग.स. सोसायटी चेअरमन मनोज पाटील, प्रकाश पाटील, रोहिदास पाटील, जिजाऊ ब्रिगेडच्या सुचिता पाटील, रेणुका पाटील, लक्ष्मी पाटील, मनोहर पाटील, योगेश देशमुख, प्रांताधिकारी मनोज देशमुख, नगरसेवक सचिन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.