जळगाव (प्रतिनिधी) अपघाताची जाणीव होताच आईने बाळाला घेतले कुशीत घेतल्याने तो वाचला. परंतू पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तरसोद फाट्याजवळ शनिवारी सकाळी घडली.
जामनेर तालुक्यातील सामरोद येथील दीपक बाबूराव कोळी (वय २७) हे पत्नी शीतल (वय २२) व मुलगा रुद्र (वय ३) यांच्यासह आसोदा येथे बहिणीला मुलगा झाला म्हणून त्याला बघण्यासाठी शुक्रवारी आले होते. शनिवारी सकाळी घरी परत येत असताना फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला ट्रकने समोरून धडक दिली. त्यात दुचाकीस्वावरील शीतल यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपकचा रुग्णालयात मयत घोषित करण्यात आले.
दुचाकी आणि ट्रकच्या धडकेची जाणीव होताच शीतल यांनी त्यांचा मुलगा रुद्र याला आपल्या छातीशी लपेटून घेतले. रस्त्यावर फेकले जात असताना त्याला काही दुखापत होणार नाही असे त्याला पकडले होते. शीतल यांचे डोके दगडावर आदळले तरी रुद्रला साधी दुखापत किंवा खरचटले सुद्धा नाही.