मुंबई (वृत्तसंस्था) भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जेजुरी येथील आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे मेंढपाळाच्या हस्ते अनावरण केल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. त्यानंतर आता पडळकर यांनी औंढा नागनाथ येथील आहिल्यादेवींच्या पुतळ्याचे अनावरण करणार असल्याचं म्हंटल आहे. गोपीचंद पडळकर यांनी ही घोषणा केल्यानंतर थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच आव्हान दिले आहे.
मागील महिन्यात जेजुरी इथं आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्याचे नियोजित करण्यात आले होते. पण त्याआधीच गोपीचंद पडळकर आणि त्यांच्या समर्थकांनी पहाटे जाऊन पुतळ्याचे अनावर केले होते. त्यामुळे राज्यात एकच राजकीय वाद उफाळून आला होता. येत्या १६ मार्च रोजी औंढा नागनाथ इथं आहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
‘आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण आम्ही करणार आहोत. गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पुतळ्याचे अनावर करण्यासाठी वेळ नव्हता. त्यामुळे सर्व समाजाच्यावतीने येत्या १६ तारखेला औंढा नागनाथ येथील आहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत, अशी घोषणाच पडळकर यांनी केली आहे. एवढंच नाहीतर गोपीचंद पडळकर यांनी या पुतळ्याचे अनावर करण्यासंदर्भातील कार्यक्रमपत्रिका जाहीर केली आहे. ही कार्यक्रम पत्रिका दाखवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमासाठी वेळच नव्हता, असा आरोप केला आहे.
पुतळ्याचे अनावरण करण्याचे जाहीर केले आहे.
दरम्यान पडळकर यांच्या या घोषणेने राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांना वेळ नाही असा आरोप केल्यामुळे ही घोषणा म्हणजे थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी आव्हान असल्याचे म्हटले जात आहे. पडळकर यांनी शरद पवार यांच्यानंतर आता उद्धव ठाकरे यांना आव्हान दिल्यानंतर आगामी काळात काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.