जळगाव (प्रतिनिधी) बोधीसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० जयंतीनिमित्त जळगाव जिल्ह्यात भंतेजी नागसेन यांनी बौद्ध उपासक उपासीकासोबत रेल्वे टेशन जवळ बाबासाहेब अभिवादन करून बौद्ध बांधवांसोबत त्रिशरण व पंचशिल घेतले.
यावेळी भंतेजी म्हणाले, बोधिसत्व यांनी भारतीय लोकांसाठी जे क्रार्य केले आहे, ते कोणीही करू शकत नाही. बाबासाहेबानी जे संविधान लिहले आणि जो अधिकार दिला. स्वाभिमान जीवण जगण्याचा हक्क स्त्रियांना जो समान अधिकार दिला. हे त्याचे पुण्य परतफेड कधीही आपण करू शकत नाही. बाबासाहेब प्रेरणादायी जीवण जगण्याचं शिकवून गेले. अशी प्रेरणा कोणतीही व्यक्ती देऊ शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी शरीर रुपाने आपल्या पासुन दुर गेले. पण त्याचे विचार नेहमी या भारतात कायम जीवतं राहतील. ज्या प्रकारे सूर्य अगदी समान प्रकाश देतो, त्या प्रकारे जे कमजोर पिडीत स्त्रियांना लोकाना अंधार रुपाने जे दु:ख आहे, त्यांना नेहमी बाबासाहेबांचे विचार प्रेरणा देतील. सूर्य तरी रात्र झाली की मावळतो, पण बाबासाहेबांचे विचार नेहमी प्रकाश देत राहतील. ज्या प्रकारे आपल्याला कोरोना बिमारीमध्येही जी सुव्यवस्था पहायला मिळात आहे. ही बाबासाहेबांनी लिहिलेली भारतीयघटनेमुळे संविधानच सर्वांचे स्वरंक्षण करेल, असेही ते म्हणाले.