जळगाव (प्रतिनिधी) भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या घोटाळ्याशी आपला दुरान्वये संबंध नाही. फक्त राजकीय द्वेषापोटी षडयंत्र रचून मला गोवण्याचा प्रयत्न होतोय. परंतू पोलीस चौकशीत सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘द क्लिअर न्यूज’सोबत बोलतांना दिली आहे.
जामनेर येथील माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी काल पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी या पतसंस्थेच्या कोट्यवधीच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्या तसेच कार्यकर्त्यांना मिळवून दिल्याचा आरोपही केला. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांचे सरकार असतांना गिरीष महाजन हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते. पालकांना आपले बालक काय उद्योग करताहेत याची माहिती नव्हती का?, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी उपस्थीत केला होता. याबाबत आज गिरीश महाजन यांच्याशी संपर्क साधला ते म्हणाले की, नियमाप्रमाणे तथा कायदेशीर व्यवहार आहेत. ‘बीएचआर पतसंस्थेच्या गैरव्यवहारावरून आपल्यावर होत असलेले आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत. एक मोठे राजकीय षडयंत्र असून पोलीस तपासात लवकरच सत्य बाहेरी येईल, असेही श्री. महाजन म्हणाले.
बातमीच्या शेवटी *अशी ….बोलले असे*नमूद आहे, शेवट करताना हस्तलेखनात चूक आहे तेवढी लक्ष्यात घ्या सर, बाकी सत्यता आहे ।आपलं news पोर्टल विश्वासू बातम्या देत असते आणि या चुका सुधारून घेणं त्या साठी महत्वाचे आहे