TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : पाळधीत ३१ मार्चपर्यंत संचारबंदी लागू ; जाणून घ्या….प्रांतधिकाऱ्यांनी आदेशात नेमकं काय म्हटलंय !

संचारबंदी किंवा कर्फ्यू म्हणजे नेमकं काय?, समजून घ्या…अगदी सोप्या शब्दात !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. यानंतर आज एरंडोल प्रांतधिकाऱ्यांनी पाळधी गावात ३१ मार्चपर्यंत गावात संचारबंदी लागू केली आहे. याबाबतचे आदेश प्रांतअधिकारी विनय गोसावी यांनी काढले आहेत. दरम्यान, संचारबंदी म्हणजे काय? हा प्रश्न अनेकांना पडला असेल. त्याचेच उत्तर याठिकाणी आम्ही देत आहोत.

नेमकी काय होती घटना !
तालुक्यातील पाळधी गावात मंगळवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान दगडफेक झाली होती. एका धार्मिक स्थळाजवळून काही जण जात असताना अचानक दगडफेक झाली. त्यात पोलिसासह तीन जण जखमी झाले. हल्लेखोरांनी तीन वाहनांचे तसेच काही दुकानांची तोडफोड केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील १०० हून अधिक जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर एरंडोल प्रांतधिकारी विनय गोसावी संचारबंदी बाबतचे काढलेल्या आदेशात काढले आहेत.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

जाणून घ्या… प्रांतधिकाऱ्यांनी संचारबंदीचा आदेशात नेमकं काय म्हटलंय ?

म्हटले आहे की, ज्याअर्थी, दि. 28/03/2023 रोजी रात्री 8:30 वाजता मौजे पाळधी गावात दोन समाजातील गट आपसात भिडले व परस्परांवर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे मी रात्री मौजे पाळधी येथे भेट दिली असता तणावपूर्ण शांतता होती. परंतू एकंदरीत परिस्थिती पाहता मी परिसरात फिरून तसेच अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व जनजिवन सुरळीत रहावे याकरीता फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये संचारबंदी लागू करणे आवश्यक असल्याबाबत माझी खात्री झालेली आहे. त्याअर्थी, मी, विनय गोसावी, उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी एरंडोल भाग एरंडोल फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (1) (2) व (3) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन मौजे पाळधी बु. व पाळधी खु. ता. धरणगाव येथे दिनांक 29/03/2023 रोजीच्या सकाळी 11.00 वाजेपासून ते दिनांक 31/03/2023 रोजीच्या सकाळी 11.00 वाजेपावेतो संचारबंदी आदेश लागू करीत आहे. मौजे पाळधी बु. व पाळधी खु. ता. धरणगाव येथे शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखणेबाबतचे गांभीर्य लक्षात घेता, वेळे अभावी संबंधितांना पुरेशी संधी देणे शक्य नसल्याने फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 (2) अन्वये हा आदेश एकतर्फी लागू करण्यात येत आहे. सदरील आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती / संस्था / संघटना यांचे विरूध्द प्रचलित कायद्यात नमूद केल्यानुसार कायदेशिर कारवाईस पात्र राहतील. सदरचा आदेश हा अत्यावश्यक सेवा उदा. शासकीय दौरे, शासकीय कर्तव्यावर हजर अधिकारी, कर्मचारी, पोलीस, रूग्णसेवा, पाणीपुरवठा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, तसेच आर्थिक वर्षाचा शेवट असल्या कारणाने गावातील सरकारी/खाजगी बँक / पतसंस्था व अंत्यविधी यांना लागू राहणार नाही.

संचारबंदी म्हणजे काय?

भारतातल्या फौजदारी दंडसंहितेतील कलम 144 हे जमावबंदी आणि संचारबंदी विषयी माहिती देतं. कायदा-सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी हे कलम लागू केलं जातं. या कलमाच्या वेगवेगळ्या तरतुदींनुसार सार्वजनिक ठिकाणी लोकांच्या हालचालींवर प्रतिबंध येतात. “संचारबंदी म्हणजे कुणालाही पोलिसांच्या पूर्वपरवानगीशिवाय बाहेर पडता येत नाही. संचारबंदीचा आदेश देण्याचा अधिकार विशिष्ट दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि दंडाधिकाऱ्यांना असतो. सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीर उद्दिष्टानं नागरिकांनी जमाव केल्यास त्यामुळं सार्वजनिक शांततेला धोका पोहोचतो, असं संचारबंदीचा कायदा मानतो.

काळात प्रशासनाला कारवाई करण्याची पूर्ण सूट
मुळातच सार्वजनिक शांतता राखण्याच्या हेतूसाठी संचारबंदी ही सर्वांत प्रभावी समजली जाते. संचारबंदीचा भंग करणाऱ्यास शिक्षा होऊ शकते. संचारबंदीच्या काळात नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी येता येत नाही. पोलीस अधिकारी किंवा दंडाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय लोकांना रस्त्यार येता येत नाही. “सामान्य नागरिकांची संचारबंदीमुळे गैरसोय आणि कुचंबणा होते. म्हणून अशी उपाययोजना कमीत कमी वेळेसाठी करावयाची असते. तर या काळात प्रशासनाला कारवाई करण्याची पूर्ण सूट असते.

शिक्षा काय होते?
संचारबंदीचं उल्लंघन केल्यास कोणती शिक्षा केली जाते?, तर याचं उत्तर असं आहे की, “संचारबंदीचे नियम मोडल्यास कुठलीही अशी ठोस शिक्षा नाहीय. मात्र, पोलीस समज देऊनही सोडू शकतात, दुसरीकडे नेऊन सोडतात, समजपत्र लिहून देतात किंवा तीन महिन्यांचा तुरुंगवासही होऊ शकतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

पाळधी दगडफेक प्रकरण : ५६ संशयित आरोपींना अटक, १६ जणांना पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आहुजा नगर परिसरात लोकसहभागातून 12 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लोकार्पण !

September 11, 2023

मानमोडी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

October 17, 2020

जिल्हा वार्षिक योजनेच्या नाविन्यपूर्ण योजनेतून जिल्ह्यात १२ कोटींच्या कामांना मान्यता !

May 4, 2021

चाळीसगाव येथे परिवहन विभागाचा ३० डिसेंबर रोजी मासिक दौरा

December 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group