मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात लवकरचं दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान दहावी आणि बारावी परीक्षांच्या निकालाबाबत आज शालेय शिक्षण मंत्री राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ही माहिती दिली आहे. यंदा दहावी, बारावीच्या बोर्डाचे निकाल येत्या 15 दिवसांत जाहीर होऊ शकतात असं ते म्हणाले आहे. एका वृत्त वाहिनीच्या एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार? मे अखेरपर्यंत हा निकाल लागतो, पण यंदा काहीसा उशीर होणार आहे, त्यामुळे अकरावी प्रवेशासाठीही उशीर होणार का? असा प्रश्न विचारल्यावर याबाबत बोलताना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सांगितलं की, “दहावी, बारावीचे निकाल येत्या पंधरा दिवसांत जाहीर करु. जरी उशीर झाला, तरी दहावीनंतरची अकरावी प्रवेश प्रक्रिया आणि बारावीनंरची प्रवेश प्रक्रिया व्यवस्थितपणे हाताळण्याचा प्रयत्न करु.” तसेच, 20 जूनपर्यंत दहावी, बारावीचे निकाल जाहीर होतील का? असं विचारल्यावर “शक्यता आहे. मी निश्चितपणे सांगू शकत नाही. पण 20 जूनपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे, असं बच्चू कडू म्हणाले.
“उशीर झाला तरी आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित पूर्ण करु. कोरोना काळात काही गोष्टींची उणीव नक्की राहिली. पण तरिही देशाच्या एकंदरीत गुणवत्तेत महाराष्ट्र अव्वल आहे, ही महत्त्वाची बाब आहे. कोरोना काळातही शिक्षकांनी दुर्गम भागांमध्ये जात अनेक प्रयोग करुन विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवलं.” , असं बच्चू कडू म्हणाले.
















