मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन होऊन आता जवळपास तीन महिने उलटले आहेत. मात्र अद्याप खातेवाटप पूर्ण झालेलं नाही. तसंच अजूनही राज्यातल्या कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री मिळालेला नाही. त्यावरुन विरोधकांकडून टीका केली जात असतानाच आता सर्व जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
औरंगाबादच्या पालकमंत्रीपदावरुन या नियुक्त्या खोळंबल्याची चर्चा होती. परंतू याच आठवड्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे ३६ जिल्ह्यांना पालकमंत्री मिळणार असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. कॅबिनेट मंत्र्यांना किमान दोन जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यातला विस्तार झाल्यावर राज्यमंत्र्यांनाही जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात येणार आहे. याच आठवड्यात पालकमंत्री घोषित होणार आहेत. पालकमंत्र्यांअभावी जिल्ह्यातली महत्त्वाची कामं खोळंबली होती. विरोधकांकडूनही या मुद्द्यावरुन टीका केली जात होती. मात्र आता हा तिढा सुटल्याचं बोलले जात आहे.