मुंबई (वृत्तसंस्था) ‘बिहारच्या जबरदस्त यशाबद्दल मी पक्षाचे निवडणूक प्रभारी फडणवीस यांचं विशेष अभिनंदन करतो. या निवडणुकीमध्ये भाजपनं जिंकलेल्या जागांमध्ये गेल्या निवडणुकीच्या तुलनेत भरघोस वाढ झाली आहे. प्रमुख पक्षांच्या जागा गेल्या निवडणुकीच्या तुलनेत घटल्या असताना, भाजपचं यश अधिक उठून दिसतं,’ असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
‘बिहारमधील जनतेने भाजप आणि संयुक्त जनता दलाच्या आघाडीला विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत देऊन विकासाच्या मुद्द्याला महत्त्व दिले आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाच्या राजकारणाचे समर्थन केले आहे,’ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ‘देवेंद्र फडणवीस यांनी बिहारमध्ये भाजप विजयी होण्यासाठी समर्पण भावनेने अपार मेहनत केली,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. पाटील म्हणाले, ‘बिहार विधानसभा निवडणूक, तसेच मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, तेलंगण आदी राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये भाजपला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पाटील यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचं व जनतेचं अभिनंदन केलं आहे. पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या कुशल संघटनात्मक नेतृत्वाखाली हे यश मिळालं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बूथ पातळीपासून पक्षाच्या बळकटीसाठी देशभर राबवलेल्या व्यापक मोहिमेचा लाभ पक्षाला होत आहे,’ असं ते म्हणाले.