मुंबई(वृत्तसंस्था) शिंदे व फडणवीस यांनी राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर महिनाभराने मंत्री मंडळाचा विस्तार सरकारने केला आहे. त्यानंतर भारतीय जनता पार्टीने मुबंई महानगर पालिकेची निवडणुकीच्या पूर्वी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली.
राज्यातील सत्तासंघर्षात राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद मिळाल्याने भाजपचं प्रदेशाध्यक्षपद रिक्त होतं. प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी कोणाला मिळणार याची चर्चा रंगली होती. या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे यांची निवड करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. आज संध्याकाळी अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. आशीष शेलार यांच्याकडे मुंबई प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण जबाबादारी देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
प्रदेशाध्यक्षपद हे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे देण्यात आलंय आणि प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा होताच बावनकुळेंनी त्यांचं लोकसभा आणि विधानसभेतलं टार्गेटही सांगून टाकलंय. लोकसभेमध्ये भाजप आणि शिवसेना मिळून 45 पेक्षा जास्त जागा निवडून आणणारच आणि येथे विधानसभेमध्ये 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणणार असं धडधडीत विधान केलंय. त्यामुळे आता बावनकुळे यांच्या या विधानांने विरोधकांनाही धडकी भरण्याची शक्यता आहे, बावकुळेंची पहिली प्रतक्रिया म्हणजे विरोधकांना इशाराच आहे.
प्रदेशाध्यपदी निवड झाल्यानंतर बावनकुळे म्हणाले, मी आज मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आपल्या माध्यमातून आभार मानतो. महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब, माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि महाराष्ट्राच्या सर्व कार्यकर्त्यांचेही खऱ्या अर्थाने आज आभार मानतो, त्यांनी माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यावर ही जबाबदारी दिली आणि या जबाबदारीतनं मला पुढच्या काळामध्ये सर्वांना सोबत घेऊन भारतीय जनता पक्ष हा जो नंबर एक पक्ष आमचा आहे, महाराष्ट्रामध्ये अजून नंबर एक कसा करता येईल, अजून त्याला आपल्या पक्षाला प्रचंड मोठं कसं करता येईल, हे पाहायचं आहे, असे म्हणत त्यांनी सर्व नेत्यांचे आभार मानले आहेत.