जळगाव (प्रतिनिधी) रेल्वे प्रशासनातर्फे भुसावळ विभागातून धावणाऱ्या २२ एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. २ ऑक्टोबरपासून सुधारित वेळापत्रकानुसार काही गाड्या पाच मिनिटे लवकर तर काही गाड्या १० मिनिटे उशिरा येणार आहेत.
रेल्वे प्रशासनातर्फे बदलण्यात आलेल्या २२ गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बहुतांश गाड्या ह्या अप असून, यामुळे भुसावळ, जळगाव, अकोला, बडनेरा, मनमाड, रावेर, वलगाव व चांदुरबाजार या रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. यात भुसावळ स्टेशनवर थांबा असलेल्या सहा गाड्यांचा समावेश असून, जळगाव स्टेशनवर थांबा असलेल्या एका गाडीचा समावेश आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणाऱ्या २२ गाड्यांचे वेळापत्रक बदलले असून, कोरोना काळापासून लागू करण्यात आलेल्या नियमांमध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत. प्रवाशांना आतादेखील तिकीट आरक्षण करूनच प्रवासाची सक्ती करण्यात आली आहे. तसेच जनरल तिकिटेही बंद ठेवण्यात आलेली आहे.