जळगाव (प्रतिनिधी) शहरातील रस्त्यांची झालेली दयनीय अवस्थेमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या पाठपुराव्याने तसेच गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाची उघडीप मिळताच आज रस्त्यांच्या डागडुजीला सुरुवात झाली.
महापालिकेतर्फे गोविंदा रिक्षा स्टॉप ते शाहूनगरकडे जाणारा रस्ता तसेच बळीराम पेठ आणि शनिपेठ या भागातील रस्त्यांसह शहरातील ठिकठिकाणी रस्त्यांच्या डागडुजी व खड्डे बुजवण्याचे काम सुरु झाले. यावेळी महापौरांनी काम होत असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या.