TheClearNews.Com
Sunday, November 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वाढती मागणी लक्षात घेऊन अंबरनाथ शहरासाठी पुरेसा पाणीपुरवठा करावा : ना. गुलाबराव पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
February 18, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अंबरनाथ शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता पिण्याच्या पाण्याची मागणी सातत्याने वाढत आहे. त्यादृष्टीने अंबरनाथ शहर पाणीपुरवठा योजनेतील अडचणी दूर करून शहरासाठी पुरेसा पाणीपुरवठा करावा असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. तर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत अंबरनाथ शहर पाणीपुरवठा योजनेचा आढावा घेण्यात आला.

चिखलोली धरणाचे काम डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण करावे. या धरणाच्या वाढीव कामासाठी वन विभागाच्या परवानगीची गरज आहे.त्यामुळे जलसंपदा व वन विभागाने तातडीने संयुक्त बैठक घ्यावी. जीर्ण जलवाहिन्या असल्यास त्या बदलण्याचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी शासनाकडे सादर करावा व निधीची मागणी करावी असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी दिले. चिखलोली धरण क्षेत्रालगत असलेल्या रासायनिक कारखान्यांमधून विनाप्रक्रिया केलेले दूषित सांडपाणी धरणात सोडण्यात येत असल्याने शहरात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे कंपन्यांच्या रसायनांचे योग्य पद्धतीने निस्सारण करण्याबाबत यावेळी निर्देश देण्यात आले.

READ ALSO

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

चिखलोली धरणाची उंची वाढविण्याचे काम हाती घेतल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सध्या ६ दशलक्ष लिटर पाणी उद्भवातून मार्च २०२० पासून जलसंपदा खात्याने बंद केलेले आहे. त्यामुळे अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्‍न निर्माण झाला. अशी माहिती यावेळी देण्यात आली. पाण्याची पर्यायी व्यवस्था करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिरिक्त पाणी उचलण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने बदलापूर – शिरगाव येथील लोकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी ५ दशलक्ष लिटर पाणी तसेच फॉरेस्ट नाका अंबरनाथ येथे ५ दशलक्ष लिटर तसेच पाले येथे २ दशलक्ष लिटर पाणी मिळण्याबाबतची मागणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत यावेळी करण्यात आली. तसेच नवरेनगर येथून १६ दशलक्ष लिटर पाणी व फॉरेस्ट नाका येथून चार दशलक्ष लिटर पाणी घेण्यात येत आहे. पाले येथील नळ जोडणीसाठी २ दशलक्ष लिटर पाणी मंजूर करण्याची मागणी औद्योगिक विकास महामंडळाने यावेळी मान्य केली. पाले येथील नळजोडणीचे काम ८० मीटर राहिले असल्याने नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि कार्यकारी अभियंता, अंबरनाथ यांनी उद्या संयुक्त पाहणी करून सिमांकनाची प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावेळी दिले.

विहित मुदतीत काम न केल्यास ठेकेदारावर कारवाई

अंबरनाथ पाणी पुरवठा योजनेचे काम ठेकेदाराकडून दोन महिन्यात पूर्ण करावे. अन्यथा त्याला नोटीस द्यावी व त्याने विहित कालमर्यादेत काम न केल्यास उर्वरित कामे नवीन ठेकेदाराकडून पूर्ण करून घ्यावीत असे निर्देश पाणीपुरवठा मंत्री पाटील यांनी दिले.

नवरेनगर संप व पंपगृहाच्या प्रस्तावास मान्यता

नवरेनगर – म्हाडा कॉलनी येथे पाणी चढत नसल्यामुळे पंप व पंपगृहाच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी तसेच येत्या पंधरा दिवसात त्याची निविदा प्रसिद्ध करावी असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर, अंबरनाथ येथील स्थानिक नगरसेवक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव किशोर राजे निंबाळकर, अंबरनाथ नगरपालिका, जलसंपदा, उद्योग व पाणीपुरवठा विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
गुन्हे

बापरे ! मेलेल्या महिलेस ‘जिवंत’ दाखवून मारला 19 लाखांवर डल्ला !

October 15, 2025
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेडला “राज्य निर्यात उत्कृष्टता” सुवर्ण पुरस्कार

October 13, 2025
राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
Next Post

धरणगाव येथे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा शिवसेनातर्फे सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वयंम पाटील यास प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान !

January 24, 2022

हिंदी अध्यापक मंडळ धरणगावची कार्यकारिणी जाहीर

November 2, 2020

क्रेडिट कार्डला लागलेला दंड रद्द करण्याच्या नावाखाली ५० हजाराची ऑनलाईन फसवणूक !

May 11, 2022

५ हजार विद्यार्थ्यांना मोफत लोककला प्रशिक्षण ; बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम !

August 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group