धरणगाव (प्रतिनिधी) राज्यात सन २०२१ मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते. या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर अशे अनुदान हे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे. परंतू सोनवद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचा अजूनपर्यंत एकही हफ्ता मिळालेला नाही. याच मागणीसाठी शेतकरी संघटनेने धरणगाव तालुका कृषी कार्यालय व तहसीलदार कार्यालयाला धडक दिली.
मागील वर्षी सन 2021-2022 या वर्षामध्ये गंगापुरी व तालुक्यातील इतर गावांमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे आपल्या सोनवद महसूल मंडळातील गंगापुरी व शेजारील परिसरात मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले होते. शासनाने नुकसानीचे पंचनामे करून अनुदान देखील तालुक्यातील काही मंडळांना मिळाले. पण सोनवद महसूल मंडळाला अजून एकपर्यंत हफ्ता मिळालेला नाही. तालुक्याचे शेतकरी नेते राजेन्द्र किसन पाटील यांनी आपल्या धरणगाव तहसील कार्यालयातील नायब तहसिलदार श्री. सातपुते साहेब यांच्या टीमला शेतकरी संघटनेच्या वतीने निवेदन दिले. याचवेळी धरणगावच्या कृषी विभागाला देखील निवेदन देण्यात आले. यावेळी राजेन्द्र किसन पाटील, विकास काशिनाथ पाटील, हेमकांत माधवराव पाटील, प्रदीप शिवाजी पाटील, दीपक मधुकर पाटील, दिनकर राजेन्द्र पाटील,कृषी कन्या अंशु दिनकर पाटील ,उखळवाडीचे सरपंच गणेश पाटील, भांबर्डी, सोनवद, तरडे,पष्टाणे आदी गावांचे शेतकरी यावेळी उपस्थित होते.