बिहार (वृत्तसंस्था) बिहारमध्ये लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा लोकशाही जिंकली आहे. एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्याबरोबर काम केलेले निर्धार आणि समर्पण यासाठी महत्वाचे आहे. मी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानतो तसेच बिहारच्या सर्व नागरिकांचे आभार मानतो, असं मोदींनी म्हटलं आहे.
बिहारमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात NDA ने स्पष्ट १२५ जागा जिंकत बहुमत मिळवत सत्ता कायम राखली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पहाटेपर्यंत सुरु होती. आता सर्व २४३ जागांचे निकाल हाती असून NDA ने १२५ जागा जिंकल्या आहेत तर महागठबंधननं ११० जागांवर विजय मिळवला आहे. एनडीएच्या १२५ जागांमध्ये भाजपने ७४ जागा. जदयूने ४३ तर मित्र पक्षांनी ८ जागांवर विजय मिळवला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं असून एनडीएला बहुमत मिळालं आहे आणि नितीश कुमार हेच बिहारचे मुख्यमंत्री होतील हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारमधील ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी-कामगार, व्यापारी-दुकानदार, बिहारमधील प्रत्येक घटकाने एनडीएच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या घोषणेवर विश्वास ठेवला. मी पुन्हा बिहारच्या प्रत्येक नागरिकांना आश्वासन देतो की आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक क्षेत्राच्या समतोल विकासासाठी पूर्ण समर्पणानं निरंतर काम करत राहू. बिहारच्या माता भगिनींनी यावेळी विक्रमी संख्येने मतदान केले. आत्मनिर्भर बिहारमध्ये त्यांची भूमिका किती मोठी आहे हे त्यांनी दाखवून दिलं. आम्ही समाधानी आहोत की गेल्या काही वर्षांत एनडीएला बिहारच्या मातृशक्तीला नवीन आत्मविश्वास देण्याची संधी मिळाली.
पंतप्रधान मोदी म्हणाले की, बिहारमधील ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी-कामगार, व्यापारी-दुकानदार, बिहारमधील प्रत्येक घटकाने एनडीएच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या घोषणेवर विश्वास ठेवला. मी पुन्हा बिहारच्या प्रत्येक नागरिकांना आश्वासन देतो की आम्ही प्रत्येक व्यक्तीच्या, प्रत्येक क्षेत्राच्या समतोल विकासासाठी पूर्ण समर्पणानं निरंतर काम करत राहू.