जळगाव (प्रतिनिधी) तापमानात झालेला बदल, अवकाळी पाऊस व डेंग्युच्या डांसासाठी असलेले पोषक वातावरणामुळे जिल्ह्यात डेंग्युचा कहर वाढला आहे. नायगाव, पाडळसेनंतर आता नशिराबाद येथे डेंग्युने थैमान घातले आहे. आज नशिराबाद येथे ७ डेंग्यु रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. एकीकडे शासनाने जिल्हा प्रशासनाला कोरोनासाठी अलर्ट दिला असुन आज आढावा बैठक होणार आहे. मात्र दुसरीकडे डेंग्युने डोकेवर काढले आहे. जुन महिन्यात डेंग्यु रूग्णांची संख्या ११ होती.ती या पाच दिवसात ७ ने वाढली आहे.
जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील नायगावला डेंग्यूची साथ आटोक्यात आल्यानंतर आता नशिराबाद गावात ७ रूग्णांचे अहवाल पॉझीटीव्ह आले आहे. त्यामुळे जिल्ह्यात डेंग्यूने डोकेवर काढले असल्याचे चित्र आहे.
पथकाकडून सर्वेक्षण
नशिराबाद येथे पथकाकडून तपासणी व सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. याठिकाणी साथीचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागातर्फे टीम नियुक्त करण्यात आली आहे. वातावरणातील बदलामुळे जिल्ह्यात डेंग्यूचा उद्रेक होण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य विभागाचे पथक याठिकाणी लक्ष केंद्रीत करीत आहेत.
डेंग्यु रूग्णांच्या संख्येत वाढ
जिल्हाभरात अवकाळी पाऊस झाल्याने ग्रामिण भागात डबके साचलेल्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होत असुन ग्रामिण भागातील रूग्णालयांमध्ये ओपीडी वाढली आहे. गेल्या महिन्यात डेंग्युच्या रूग्णांची ११नोंद झाली आहे. गेल्या सहा महिन्यात १२० संशयित रूग्ण आढळले असुन २१ रूग्ण संख्या ढालीदरम्यान खासगी रूग्णालयात अनेक रूग्ण उपचार घेत असल्याने डेंग्यु रूग्णांचा आकडा वाढल्याची देखील शक्यता आहे.