औरंगाबाद (वृत्तसंस्था) तीन तीन महिन्यांचा तर आमदार करता येत नाही, त्यासाठी घरात काही जणांना नाराज करावं लागतं, एकाला न्याय तर बाकीच्यांवर अन्याय असं होतंच असते. संग्राम देशमुख हा काही माझा जावई नाही, मेधा काही दुश्मन नाही, असंही चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीही मेधा कुलकर्णी यांनी विधान परिषदेची उमेदवारी न मिळाल्यावरून नाराजी व्यक्त केली होती.
भाजपकडून मला हल्ली बैठका आणि आंदोलनासाठी निरोप दिले जात नसल्याचे सांगत माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी पुन्हा एकदा पक्षाविषयी नाराजी व्यक्त केली होती. महापालिका निवडणुकांच्या बैठका होतात, त्याचाही निरोप दिला जात नाही, आजच्या आंदोलनाचाही मला निरोप देण्यात आला नव्हता. त्यामुळे माझे पक्षाला काही प्रश्न आहेत, ते मी पक्ष पातळीवरच विचारेन, असे वक्तव्य मेधा कुलकर्णी यांनी केल. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी कोथरुड मतदारसंघात चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मेधा कुलकर्णी यांचे तिकीट कापण्यात आले होते. यानंतर भाजपकडून त्यांचे विधानपरिषदेत पुनर्वसन होणे अपेक्षित होते. मात्र, भाजपने पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर झाल्यानंतरही त्यांच्या नावाचा विचार केलेला नाही. त्यामुळे मेधा कुलकर्णी भाजपवर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. अगदी मेधा कुलकर्णी मनसेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही कानावर येत होत्या.