लोणावळा (वृत्तसंस्था) अहमदनगर येथून खोपोली येथे देवदर्शनासाठी जाणाऱ्या पिकअप जीपचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून २५ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात जुन्या मुंबई- पुणे पुणं राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्यातील वलवण पुलाजवळ झाला आहे.
लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यामधील संगमनेर मधील पिंपळदरी परिसरामधील भाविक हे अहमदनगर येथून खोपोली येथील गगनगिरी महाराज मठ या ठिकाणी देवदर्शनाकरिता पिकअप वाहनाने (क्रमांक- एमएच-14- जीयु- 9227) जात होते. मंगळवारी पहाटे २ ते ३ वाजेच्या सुमारास भरधाव वेगात वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे पिकअप गाडी लोणावळ्या मधील वलवण गावच्या हद्दीत जुन्या मुंबई- पुणे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या पुलाच्या सिमेंटच्या कठड्यावर जोरात धडकली आहे.
पिकअप वाहन चालक संदिप ज्ञानेदव भालके (वय-४१) रा. कोठे बुद्रुक, सगमंनेर,अहमदनगर आणि दिपक सुभाष कडाळे (वय-१८) रा.पिंपळदरी, अकोले, अहमदनगर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर जखमींमध्ये अक्षय पंढरी कडाळे, अजय भाऊसाहेब कडाळे, राकेश कडाळे, निलेश कडाळे, विजय शिवाजी मेंगाळ, रेवन कडाळे, अवदुत मधे, अर्जुन कडाळे, करण कडाळे, संतोष पारधी, विलास कडाळे, प्रविण दिंगबर भगत, विजय ज्ञानदेव कडाळे, ओंमकार प्रकाष कडाळे, लक्ष्मी कुंडलीक कडाळे, रेश्मा पारधी, काजल कडाळे सर्वजण रा.पिंपळदरी ता. अकोले जि.अहमदनगर येथील आहेत. अमोल सावळेराम दुधवडे (रा. करजुले पठार,संगमनेर, अहमदनगर) करण सुदाम उघडे (वय-१९) रा.गुंजाळवाडी, संगमनेर, अहमदनगर तसेच इतर ५ महीला आणि ५ लहान मुले (पुर्ण नाव माहीत नाही) यांचा समावेश आहे.















