जळगाव (प्रतिनिधी) फटाके दुकान मालकाच्या घरी दिवाळीची साफसफाईसाठी आलेल्या १७ वर्षीय युवकाचा वीज तारेवर पाय पडल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी रिंगरोड परिसरात घडली. एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. आनंदा संजय भराडे (वय १७, रा.रा. मन्यारखेडा ता. भुसावळ, ह.मु. सुभाष चौक)
घरी साफसफाई करण्यासाठी गेले अन् घात झाला !
शहरातील राजकमल टॉकीज परिसरातील अनिल अग्रवाल यांचे फॅन्सी फटाके नावाने दुकान असून त्याठिकाणी भुसावळ तालुक्यातील मन्यारखेडा येथील सुनिल चव्हाण हा तरुण सागर सुभाष शिंदे याच्यासोबत पंधरा दिवसांपासून कामाला लागला होता. मंगळवारी अनिल अग्रवाल यांनी दोघ मुलांना रिंगरोडवरील यशवंत कॉलनीत असलेल्या घराची साफसफाई करायला सांगितले होते. त्यानुसार सुनिल व सागर यांच्यासोबत दुकानातील पवन नावाचा मुलगा हे तिघे बुधवारी सकाळी अग्रवाल यांच्या घरी साफसफाई करण्यासाठी गेले. त्यांनी घरातील कंपाऊंटमधील साफसफाई केल्यानंतर अग्रवाल यांच्या कुटुंबियांनी त्या तिघ मुलांना त्यांच्या घराशेजारी असलेल्या प्लॉटमधील गवत काढण्याचे सांगितले होते.
तारावर पाय पडला गंभीररित्या भाजला गेला !
मोकळ्या प्लॉटमधील काही गवत काढल्यानंतर पवन आणि सुनिल यांनी त्याठिकाणी लोंबकळणारी वायर ओढून ती फेकून दिली. दरम्यान, दुसरी वायर काढण्यासाठी जात असतांना गवतामध्ये पडलेल्या विद्युत तारावर सुनिलचा पाय पडला. त्याला विजेचा जोरदार धक्का बसल्याने त्याच्या अंगावरील कपडे जळून गेले तर मानेला देखील गंभीर दुखाप होवून तो गंभीररित्या भाजला गेला.
काठीने तार दूर करीत केले !
गवत काढण्याचे काम करीत असतांना सुनिल सोबत असलेल्या पवनच्या हातात लाकडी काठी होती. तर सागर हा पाणी आणण्यासाठी गेला होता. सुनिलला विजेचा शॉक लागल्याचे लक्षात येताच त्या दोघांनी त्याठिकाणी पडलेल्या लाकडी काठीने तेथील तार दूर केले. त्यानंतर सुनिलला एका वाहनातून तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. तर पवन हा बालंबाल बचावला.
कुटुंबीयांचा मन हेलवणारा आक्रोश !
एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूची माहिती मिळाल्यावर आई-वडिलांना मोठा धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांसह सुनिलच्या कुटुंबियांनी घटनास्थळी धाव घेतली. मुलाचा मृतदेह बघताच सुनिलच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आक्रोश केला होता. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मालकावर कारवाई व्हावी म्हणून नातेवाइकांनी मृतदेह घेण्यास नकार दिल्याने गोंधळ उडाला होता.