औरंगाबाद (वृत्तसंस्था) राज ठकारेंनी (Raj Thackeray) गुढी पाडवा मेळाव्यात अझानवरुन निशाणा साधला आहे. मस्जिदीवरुन भोंगे काढा नाहीतर त्याच्या दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. यावर कोणतेही वक्तव्य करु नका असे फर्मान असदुद्दीन ओवैसी यांनी दिले असल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी पार्क येथे त्यांच्या पक्षाच्या वार्षिक गुढीपाडवा मेळाव्याला काल संबोधित केले. मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत सरकार काही निर्णय घेणार नसेल, तर मशिदींसमोर दुहेरी लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचा जप करू, असा इशारा राज ठाकरेंनी आपल्या धडाकेबाज शैलीत दिला. मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील मशिदी आणि मदरसांची पोलिसांनी नीट तपासणी केल्यास त्यांना अनेक गोष्टी कळतील, असेही ते म्हणाले. त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर ठिकाणची बदलती लोकसंख्या अधोरेखित केली आणि पाकिस्तान आणि बांगलादेशातून अनेक मुस्लिम येथे येऊन स्थायिक झाल्याचा आरोप केला.