धरणगाव (प्रतिनिधी) पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शहरातील नेहरू नगरमधील १५१ घरांचे अतिक्रमण नियमित करण्याचे आदेश नुकतेच एरंडोल प्रांतधिकाऱ्यांनी काढले आहेत. याबाबत महायुतीचे पदाधिकारी अँड वसंतराव भोलाणे, रवींद्र कंखरे यांनी आज शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.
शहरातील संजय नगर, पारोळा नाका, नेहरूनगर, रामदेवजी बाबा नगर, हनुमान नगरमधील काही भाग विविध सरकारी जमिनींवर शहरातील बेघर नागरीक गेल्या 30 वर्षापासून राहत आहेत. परंतु अदयाप पर्यंत या राहत असलेल्या नागरीकांना नागरीक सुविधा मिळत नव्हत्या. त्यांच्या नावावर राहत असलेले घर नावावर होत नव्हते, त्यांना स्वतःचे घर देखील बांधता येत नव्हते. तसेच बँकेकडून देखील कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळत नव्हते. तसेच त्यांना प्रधानमंत्री आवास योजना व रमाई घरकुल योजना इत्यांदी शासकिय योजनाचा लाभ घेता येत नव्हता. वास्तिवीक पाहता जे नागरीक दिनांक 01/01/20211 पुर्वी किंवा तत्वपुर्वी राहत असतील तर महाराष्ट्र शासनाचा दिनांक 04/ 03/2019 चा नियमाप्रमाणे शासकिय जागावर अशा लोकांना अतिक्रमन केलेले असल्यास ते नियमित करुन दयावे, असे शासनाचे आदेश होते. परंतु धरणगांव नगरपालिकातर्फे कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात येत नव्हती.
यासाठी दिनांक 25/08/2023 रोजी धरणगांव नगरपालिका प्रशाननाला बेघर अतिक्रमण संघर्ष समितीतर्फे अध्यक्ष अॅड. व्हि.एस. भोलाणे व सचिव रविंद्र कंखरे यांच्या नेतृत्वात मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले होते. सदरचे निवेदन देतांना आपल्या जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे देखील उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एरंडोलचे उपविभागिय अधिकारी, धरणगाव भुमी अभिलेख अधिकारी, धरणगाव पालिकेचे मुख्यधिकारी यांना आदेश दिले होते की, शासनाच्या नियमाप्रमाणे जे नागरीक दिनांक 01/01/2011 किंवा तत्पुर्वी त्यांचे अतिक्रमण नियमित करण्यात यावे. त्यानुसार एरंडोल प्रांतधिकाऱ्यांनी आदेश क्रमांक क्र./जमीन-1/कवि/193/2024 दिनांक 18/07/2024 रोजी नेहरूनगर या भागात राहत असणा-151 लोकांचे अतिक्रमण नियमीत करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच धरणगाव शहरातील उर्वरीत अतिक्रमण देखील नियमीत करण्याचे आदेश देखील त्वरीत देण्यात येणार असल्याची माहिती देखील श्री. भोलाणे आणि श्री. कंखरे यांनी दिली. यावेळी भारतीय जनता पार्टी व शिवसेना या महायुतीचे पदाधिकारी गटनेते पप्पू भावे, विजय माळी, माजी नगरसेवक अभिजीत पाटील, कैलास माळी सर, डॉ. हेडगेवार ग्रामपंचायतचे उपसरपंच चंदन पाटील, पुनिलाल महाजन, शिरीष बयस, शिवसेना शहरप्रमुख विलास महाजन, संजय चौधरी, बुट्या पाटील, पवन महाजन, यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.