दीपनगर(प्रतिनिधी) :- सिद्धार्थ गौतम बुद्ध यांनी समस्त मानवास केवळ धर्मग्रंथात लिहिले आहे वा हजारों लोक सांगत आहेत वा हजारो वर्षोंपासून चालत आले आहे म्हणून ती गोष्ट सत्य आहे असे न मानता ती गोष्ट तुमच्या सदसदविवेक बुद्धिस सत्य आहे असे वाटत असेल तरच तिचा स्वीकार करा वा सत्य आहे असे माना असा संदेश दिला आणि जगात बुद्धिप्रामाण्यवादाची निर्मिति झाली असे स्पष्ट प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी केले
प्रागतीक विचार मंच भुसावळ तर्फे 30 ऑक्टोबर रोजी दीपनगर येथील बुध्द विहारात धम्मचक्र प्रवर्तन मैत्री सोहळा मध्ये मुख्य वक्ता म्हणून भाषण करतांना वाघ बोलत होते जयसिंग वाघ यांनी आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात पुढं सांगितले की गौतम बुध्द यांनी जगात सर्वप्रथम स्त्री पुरूष समानता प्रस्थापित केली , शांतता , अहिंसा ही तत्वे सांगितली , मानवाचे आदि कल्याण , मध्य कल्याण , अंतिम कल्याण यास आपल्या विचारांचा केंद्रबिंदु ठरविले, गौतम बुद्ध यांनी कार्यकारणभाव हा सिद्धान्त मांडला त्यांचा हा सिद्धांत वैज्ञानिक पातळीवर खरा ठरला म्हणून आइंस्टाइन यांनी बुद्ध यांना जगातील पहिला वैज्ञानिक संभोदले असेही वाघ यांनी सांगितले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जे पी सपकाळे होते त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की गौतम बुद्ध यांचे तत्व मानवतावादी असल्याने बौद्ध धर्मास जनाश्रय व राजाश्रय मिळाला व तो जगभर प्रसारित झाला असे विचार व्यक्त केले
प्रा डॉ जतिन मेढ़े यांनी कार्यक्रमाची भूमिका विशद करुन मोहन सरदार , नीलेश रायपुरे , दिपरत्न तायड़े , समाधान जाधव , सुरेखा तायड़े यांचा सत्कार केला. प्रास्ताविक मोहन सरदार , सूत्रसंचालन विनोद बारे , परिचय प्रा प्रशांत नरवाड़े यांनी तर आभार प्रदर्शन नीलेश रायपुरे यांनी केले मंचावर सुनील रामटेके , डॉ वंदना वाघचौरे , अलका सपकाळे , रामकृष्ण सुरवाड़े , प्रा दिलीप तायड़े , प्रा महेंद्रकुमार , प्रा सुरेश बछाव , मुकुंदा बारे , नितिन सोनवणे होते सुरवातिस बुध्द वंदना घेवून नंतर भगवान बुध्द , शिवाजी महाराज , महात्मा फुले , बाबासाहेब आम्बेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले , कार्यक्रमास स्त्री पुरूष मोठ्या संखेने हजर होते