अमरावती (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील अचलपूर शहरातील विलायतपुरा परिसरातील एकाच विहिरीत दोन सख्ख्या भावांचे मृतदेह आढळल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रभात मिश्रा (वय ६५ वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय ५० वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत.
एकाच विहरीत दोघा सख्ख्या भावांचे मृतदेह आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अमरावतीच्या अचलपूर शहरात ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एकाच विहिरीत दोन पुरुष मृतावस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. मंगळवारी रात्रीच्या सुमारास अमरावती जिल्ह्यात अचलपूर शहरातील विलायतपुरा बैलजोडी चौकातील विहिरीत दोघांचे मृतदेह सापडले होते.
आत्महत्या, घातपात की अपघात?
प्रभात मिश्रा (वय ६५ वर्ष) आणि अरुण मिश्रा (वय ५० वर्ष) अशी दोन भावांची नावे आहेत. मात्र दोघा भावांचा अपघात झाला, त्यांच्यासोबत घातपात झाला की त्यांनी आत्महत्या केली, याविषयी अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे.