धुळे (प्रतिनिधी) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या ‘अँटिलीया’ स्फोटक प्रकरणाचे कर्ते, कर्वीते अन्य कुणी अतिरेकी नाही तर, पोलीसच होते. सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ झालं आहे. सत्तेत सरकार कुठल्याही पक्षाच आलं तरी, गृहमंत्री कोण? याकडे महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेचे लक्ष असते. यासाठीच की, आपल्या राजकीय विरोधकांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवता येते ! विरोधक अन्य पक्षातीलच असलेच पाहीजे असे नाही. तर, स्वपक्षीयांवर सुध्दा कुभांड रचून त्यांचा बेमालूमपणे कसा काटा काढायचा. याचा आदर्श देवेंद्र फडणवीसांनी आख्या महाराष्ट्राला घालुन दिला, असे धुळ्याचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
आपले राजकीय प्रतिस्पर्धी माननीय नाथाभाऊ, हे आतंरराष्ट्रीय डॉन दाऊद इब्राहिमच्या बायकोशी बोलतात. असले अत्यंत खालच्या दर्जाचे आरोप केले. बरे झाले, दाऊदने विश्वास ठेवला नाही. नाही तर, भारतात नाथाभाऊंच अन् पाकिस्तानात दाऊदच्या बायकोच काही खर नव्हत ! आरोप ऐवढे बालीश अन् हास्यास्पद होते की, कुणी विश्वास ठेवला नाही. नाथाभाऊंच्या कार्यालयात कोट्यावधींची लाच घेतली जाते. असले संदर्भहीन, हीनदर्जाचे बिनबुडाचे आरोप करुन व्यवस्थितपणे नाथाभाऊंना सत्तास्पर्धेतून बाजूला सारले. ज्या व्यक्तीने स्वतःचे घरदार, प्रकृती याची यत्कींचीतही पर्वा न करता. माननीय मुंडे साहेबांच्या खांद्याला खांदा लावून शेटा भाटांचा पक्ष खेड्यापाड्यात पोहोचवला. ज्या मुंडे साहेबांनी देवेंद्र फडणवीसांना भाजपाच्या अध्यक्षपदी नियुक्त करुन मुख्यमंत्रीपदाची वाट मोकळी करुन दिली. मुंडे साहेबांच्या राजकीय वारस सौ. पंकजाताई यांनाच पध्दतशीरपणे पराभूत करुन वाटेतून दुर केले. मुंडे साहेबांच्या उपकारांची फेड अशा पध्दतीने केली. तर, नाथाभाऊंना इतके छळले की, रक्त आटवून उभा केलेला पक्षच वैतागून त्यांना सोडून द्यावा लागला. यासर्व कामात देवेंद्र फडणवीसांनी पोलीसांच्या शक्तीचा केलेला वापर कल्पनेच्या पलीकडचा आहे. हा झाला सत्तेत असतांनाचा पहिला भाग. विरोधात असलेल्या सत्तारुढ पक्षाला नामोहरम करण्याकरिता विरोधी पक्षात राहूनसुध्दा पोलीस यंत्रणेचा कसा दुरुपयोग करता येतो. याचे नीच वर्तन महाराष्ट्राला घडवले! त्याचेच विकृत स्वरुप म्हणजे धुळे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेची जाणीवपूर्वक केलेली दयनीय अवस्था होय !
हातचे लपवून न ठेवता आणि परिणामांची पर्वा न करता जे अंतीम सत्य आहे. मांडतांना मी कधीही कुणाचीही पर्वा केली नाही. उगाच टिळक, आगरकर, जांभेकर यांच्या नावाचा जप करायचा आणि पोटात मात्र दाऊद इब्राहिम कासकर ठेवायचा असले धंदे म्हणजे ‘वेश्यांच्या वसाहतीत राहून, जगाला पतिव्रत्याचे धडे देण्यासारखे आहे. फडणवीस व त्यांच्या टोळीने गेल्या पाच वर्षात गृहखात्याची इतकी वाट लावली, की केवळ एकट्या मुंबईतच सचिन वाझे तयार केला नाही. तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सचिन वाझे पैदा करुन ठेवले आहेत. खोटे गुन्हे दाखल करणे, न्यायालयांची दिशाभूल करणे, स्वतःच्या ढुंगणाची शांती करण्याकरीता, चोरुन आणायला लावलेल्या नवनवीन गाड्या वापरणे, अमाप संपत्ती गोळा करुन, आपल्या वरिष्ठांना कटात सहभागी करुन घेणे, त्यांचे तोंड पैश्याच्या तोबऱ्याने बंद करणे प्रसिध्दी माध्यमांना त्यांची किंमत चुकवून आपल्या कटात सहभागी करून घेणे. राज्यकर्त्यांना खुश करण्याकरीता खाकी वर्दीचा सर्रास गैरवापर करणे, आपल्या हाताखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना लायकीप्रमाणे राजकीय कट कारस्थानात सहभागी करुन घेणे.. हीच तर, सचिन वाझेची कार्यपध्दती आहे. या कार्यपध्दतीत आणि धुळे जिल्ह्यात गेल्या पाच सहा वर्षात हेमंत पाटलांनी घातलेल्या नंग्यानाचात फरक काय आहे ? असली कारस्थान पार पाडण्याकरिता सचिन वाझेने ज्याप्रमाणे रिवाज काझी, विनायक शिंदे काही प्रमाणात प्रदीप शर्मा यांचा वापर करुन खाकी गणवेशातील एक टोळीच तयार केली होती. हेमंत सुभाष पाटलांनी धुळे शहरात नेमके वेगळे केले काय ? डॉ. हेमंत देशमुख या ८२ वर्षाच्या दोनवेळा आमदार राहीलेल्या, एकदा मंत्री राहीलेल्या वयस्कर राजकारणी माणसाला ९ वर्षाच्या बालीकेवर बलात्कार केल्याच्या खोट्या गुन्ह्यात अडकवले. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सदर एफ.आय. आर. खोटी, बोगस व असा गुन्हा घडला नसल्याची नोंद करुन एफ. आय. आर. च रद्द करून टाकली खोटा गुन्हा दाखल करणाऱ्याविरुध्द कार्यवाही करण्याचे आदेशही दिले. पण जिल्ह्यातील गुन्हेगारी टोळीचे राजकीय आश्रयदाते जयकुमार रावल यांनी त्यांना संरक्षण देऊन पोलीसांमधील गुन्हेगार प्रवृत्ती नष्ट करण्याऐवजी आपल्या राजकीय स्वार्थासाठी अपप्रवृत्तीला खतपाणी घालून वृधींगत केले. परिणामतः सुप्त गुन्हेगारी प्रवृत्तीला बहरच आला. आपले राजकीय शत्रूत्व निभावण्याकरिता जयकुमार रावलांनी हेमंत पाटलाचा वापर केला नसता तरच आश्चर्य वाटले असते. केंद्र व राज्य सरकारच्या विशेष तपासी पथकाने घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाला नसल्याचे आपल्या अहवालात किमान सातवेळा नमुद केले आहे. तरीही डॉ. देशमुखांना पाच महिने, अॅड भावसार यांना तीन महिने आणि गिरधारीलाल रामरख्या यास १४ महिने तुरुंगात सडवले. कांच्या मनात मराठा समाजाबद्दल इतका द्वेष आहे. की, हेमंत पाटील या मराठ्याला हाताशी धरुन डॉ. देशमुख दुसऱ्या मराठ्याचा काटा काढण्याकामी वापरले. हे काही मी आज लिहीत नाही. धुळ्याचे पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्याकडे २० एप्रिल २०२० रोजीच लेखी तक्रार केली आहे. पण, तेही तक्रारीवर वेटोळे मारुन फणा काढून बसले. पोलीस नियंत्रण कक्षातून हेमंत पाटलांना शिरपुरसारख्या सिमेलगतच्या पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती देवून खंडणी गोळा करण्याच्या तिजोरीचा ताबाच दिला. ‘असे कसे केले ? असे कुठल्याही पोलीस अधिकान्याला विचारले असता, वरीष्ठांचा दबाव आहे. असे बिनधास्तपणे सांगून मोकळे होतात. माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतांना त्यांनी खामगावचे आमदार दिलीप साबद्रा यांच्या वडीलांना अटक करु नका, असा दुरध्वनी केला. पोलीस निरीक्षकही डोक्यावरचा होता. त्याने स्टेशन डायरीतच नोंद करुन ठेवली. माननीय सर्वोच्च न्यायालयाने विलासराव देशमुख यांना १० लाख रु. दंड ठोठावला. याला म्हणतात बाणेदारपणा! प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यालाच धडा शिकवला. आपल्या धुळ्याचे पादर फुसके पोलीस अधिकारी, नामचीन गुंड नगर सेवकाने फोन केला तरी, त्यांच्या अंर्तवस्त्राचे रंग बदलतात.
मी कांदीवली क्राईम ब्रँच गुन्हा रजिस्टर क्र. ७ / २१ दि. ९ जानेवारी २०२१ माहिती घेण्याकरीता स्वतः जाऊन आलो. शेख व उत्तेकर नावाचे जे पोलीस अधिकारी तपासाच्या नावाने खंडणी गोळा करून गेले. त्यांची येथून हकालपट्टी झाली. त्यांचे वरीष्ठ अधिकारी सुनील माने यांना त्वरीत बदलले. क्राईम ब्रँच मग ती मुंबई असो किंवा धुळ्याची; क्राईम ब्रँचच खाकी गणवेशातील गुन्हेगाराचा अड्डा होत चालला आहे. सदर एफ. आय. आर. मध्ये स्पष्टपणे नमुद केल आहे की, सदरवेळी पोलीसांना इसम नामे इम्रान रहिम पिंजारी वय ३० वर्षे व जुबेर फजल खान वय ४२ वर्षे यांच्याकडे मिळून आलेल्या अग्निशस्त्रे व दारुगोळ्याबाबत पुन्हा विचारणा केली असता त्यांनी सदरची अग्निशस्त्रे व दारुगोळा हा त्यांना इसम नामे संजय जोंधळे उर्फ अप्पा राहणार धुळे व दिनेश पाटील जलगंगा सोसायटी गाडी नं. एम. एच. ०४ जी.डब्लू ४८७४ दहा जिवंत काडतूसे गाडीमध्ये सापडली. सदर ४ रिव्हॉलव्हर धुळे येथील त्यांचे मित्रांनी दिल्याचे सांगितले. सदरची अग्निशस्त्रे व दारुगोळा हा त्यांनी बेकायदेशीररित्या स्वतःचे कब्जात ठेवल्याचे सांगून त्याबाबत कोणताही परवाना घेतला नसल्याचे सांगितले.
इसम नामे इम्रान रहिम पिंजारी वय ३० वर्षे याचे नेसणीस असलेला एक ग्रे रंगाचे चमकदार लाल पांढरे फुले असलेले फुल शर्ट व टॉमी न्यूयॉर्क लिहीलेली निळ्या रंगाची ट्रॅक सुट आहे. तसेच इसम नाम जुबेर फजल खान वय ४२ वर्षे याचे नेसणीस पिवळ्या रंगाचे फुल शर्ट व काळ्या रंगाची पॅन्ट आहे. सदर दोन्ही इसमांची पोलीसांनी बारकाईने तपासणी केली असता त्यांचे शरीरावर ताज्या माराच्या जखमा अथवा निशाण्या नव्हत्या. पोलीसांनी वर नमुद दोन्ही इसमांना त्यांच्या ताब्यात मिळुन आलेले चार देशी बनावटीचे पिस्टल व काडतुसांसह पुढील कार्यवाहीसाठी ताब्यात घेतले.
श्रीमान चिन्मय पंडीत साहेब आपल्या लाडक्या क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांच्या कर्तुत्वाची नुकतीच घडलेली आणखी घटना आपणास माहित नसावी, असा समज करुन सांगतो. मुंबई क्राईम ब्रँचच्या टिमने संजय जोंधळे याला धुळे येथून उचलून मालेगाव येथे नेले.
आपणास एक गोपनीय माहिती देऊ इच्छितो. आपले पत्रक वाचले. धुळे जिल्हा पोलिस दलाबाबत जे काही आपण दिले तशीच एक माहिती अशी आहे की, धुळे एल. सी. बी. ला असलेले कुणाल पानपाटील, उमेश पवार, राठोड यांचे अट्टल गुन्हेगारांचे असलेली जवळीक संबंधाबाबत दोन-तीन दिवसांपूर्वी देवळा पोलिस स्टेशनला वसीम शेख उर्फ वसीम बाटला व सादिक शेख उर्फ साबीर खाबड या दोघांना अटक करुन मालकाकडून दहा लाखाची खंडणी मागितल्या बद्दल गुन्हा दाखल झाला आहे. सध्या ते रिमांड मध्ये आहेत.
वसीम बाटलाचा मोबाईल क्रमांक ९३७०७४९२५४ हा असून सदर आरोपी वर धुळे, नंदुरबार, जळगाव, नगर, नाशिक, मध्यप्रदेश, निझर, गुजरात या ठिकाणी चार चाकी गाडी चोरी, घरफोडी, किडनपिंग, मारामारी, पिस्टल च्या केसेस असून सदर आरोपी धुळे जिल्ह्यात थैमान माजवत आहे. तो फक्त या वरील तीन एल.सी.बी. च्या कर्मचान्यांच्या जीवावर ! त्यापैकी कुणाल पानपाटील हा वसीम व त्याच्या साथीदारने चोरी करुन आणलेल्या मालाचे वाटप करण्याचे काम करतो. जर कुणाल पानपाटील चा मोबाईल क्रमांक वसीम बाटल्याचा मोबाईल क्रमांक चेक केला तर दिवस व रात्र हे दोघं संपर्कात असल्याचे निष्पन्न होते. कुणाल पाटीलचा मोबाईल क्रमांक ९९८७३३५५२८, ९०४९६२९५४३ असे असून वरील आरोपींनी धुळे शहरात असलेले स्टार्च फॅक्टरी मधील सुमारे १० कोटी रुपयांचा जर्मन, पीतळ, तांबे, हा माल लेलँड गाडी याच्यामध्ये सिक्युरिटीमध्ये स्विफ्ट डिझायर, अशोक लेलँड गाडी यांच्यामध्ये व वाहून गायब केलेला आहे. आजूबाजूच्या खेडे गावातील गाई चोरुन आणल्यावर कापले गेल्यानंतर, वाटलेल्या काही हिस्सा या पोलिसांना जातो वरील तीनही कर्मचारी हे धुळे शहरातील आमदार फारुक शाह यांचे खास पोलीस खात्यातील बातमीदार असून फारुक शाहचे हितचिंतक आहेत. आमदाराचे दोन नंबर वाल्यांचे पैसे जमा करण्याचेही काम कुणाल पाटील करतो. अजून असे खुप गुन्हेगार या कर्मचाऱ्यांनी आपल्या हाताशी ठेवलेले आहेत. त्यांच्यासोबत हिस्से वाटप हे करीत असतात. अण्णासाहेब आपण जर आपले लोक लावले आपल्याला समजेल जी माहिती सांगितली आहे. ती खरोखर आहे. आपण खरोखर पोलीस खात्यात किड काढू इच्छितात तर, आशा कर्मचाऱ्यांवर पहिले कठोर कारवाई व्हावी. आपले पत्रक काढून पोलीस अधिक्षक यांना चेतावणी देण्यात यावी ही विनंती. पंडीत साहेब आपण आय.पी.एस. दर्जाचे वरीष्ठ अधिकारी आहात. किमान त्या पदाची तरी लाज राखा ! ज्याला पोलीसांच्या दैनंदिन पोलीसांच्या व अब्रुमूळे बीचारा अस्वस्थ झाला आहे. आपल्या विभागाचा ढिम्मपणा, कोडगेपणा व भ्रष्टाचान्यांना पाठीशी घालण्यासाठी सुरु असलेले प्रयत्न पाहून त्यालाच लाज वाटली असावी. ‘कुछ तो शरम करो’
मागच्या प्रसिध्दी पत्रात नमुद केलेल्या एका हत्या प्रकरण पुनःश्च एकदा विदित करतो. मनसुख हिरेन याची हत्या करणे आणि हत्या करणाऱ्या आरोपींना अटक न करणे यात नेमका फरक आहे तरी काय ?
धुळे जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हेमंत पाटील, बंडू कुळकर्णी किंवा त्यांच्या सोनेरी टोळीत असलेले यांच्यात आणि वाझे टोळीत गौतम सपकाळे, रफिक, कुणाल पाटील, राहूल सानप, उमेश पवार, राठोड व अन्य तीन. नेमका याच्यामध्ये फरक तरी काय आहे ? तेही चोरीच्या गाड्या वापरतात. हे पण चोरीच्या गाड्या पाठवतात. वाझेंकडे ९ गाड्या सापडल्या यांची झाडाझडती घेतली तर किमान १०-१०, १५-१५ गाड्या सापडतील. वाझेही खोट्या केसेस दाखल करीत होता. हेमंत पाटलाच्या टोळीला तर खोटे गुन्हे दाखल करून छळ करणे यांचे आंतरराष्ट्रीय पारितोषिक द्यावे लागेल. आपल्या मालकाला खुश करण्याकरिता पोलीस गणवेशाचा अक्षरश: बाजार मांडला. हेमंत पाटील जसे काय रॉबीन हूड आहेत. असे उदत्तीकरण करणारे भिकारचोट पत्रकार दोन पाच हजारासाठी आणि वाळूच्या ट्रकमध्ये भागीदारी मिळवण्याकरिता हेमंत पाटलाचे सत्कार काय करतात. वाढदिवस काय साजरा करतात. जसे काय यांचे अन्नदाते आहेत. आपण पत्रकार होतो. हे सांगायलासुध्दा हल्ली मला लाज वाटते. धुळे जिल्ह्यात पत्रकारांना कोणी भीत नाही. एखाद्या पत्रकाराने जर एखादी बातमी छापली नाही. तर अगदी ग्रामीण भागातील अशिक्षित माणूससुध्दा याले गू खावाले भेटेल नई व्हणार’ अशी सहज प्रतिक्रीया व्यक्त करतात.
कालच आग्रा महामार्गालगत असलेल्या एका ढाब्यावर एल.सी. बीने धाड टाकली एका कंटेनरमधून ८० ए.सी. पकडले. पंचनामा फक्त २० ए. सी. चांच केला ! याची बातमी वरीष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत पोहचली नाही का ? पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न पडतो की, या अनिल गोटेला कळतं तरी कसं माझ्याकडे तर अशा माहिती (Informations) घर बसल्या येत असतात. त्याच कारण एकच आहे की, गेल्या ५० वर्षात मी प्राप्त केलेला जनतेचा विश्वास ! त्यामुळे सामान्य नागरीक, गोर गरीब जनता मला अत्यंत विश्वासाने येवून सांगत असते. अर्थात हे माझ भाग्यच की, आपल्याकडे असलेली अत्यंत गुप्त माहिती आपल्या कुटूंबातील सदस्यांना न सांगता ते बिचारे अत्यंत विश्वासाने व आपण दिलेल्या माहितीचा दुरुपयोग होणार नाही याची बालंबाल खात्री असल्यामुळे मला सांगून आपल्या हृदयात साठवलेले रहस्य खुलेपणाने सांगतात. याच्याएवढे भाग्य मला लाभले यातच मला आनंद आहे.
शिरपूरच्या गांजा प्रकरणाची २४ नोव्हेंबर २०२० रोजी मी बोंबाबोंब केली नसती तर बऱ्याच लोकांचे पोटकल्याण झाले असते. माननीय आर. आर. पाटील गृहमंत्री असतांना ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत डान्सबार आढळत होते. तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला तत्क्षणी ते निलंबीत करायचे. मला आश्चर्य याचेच वाटते की, एवढे दणदणीत कागदोपत्री पुरावे देऊनसुध्दा गृहखाते व धुळ्याचे पोलीस अधिक्षक तसेच नाशिकचे पोलीस महानिरिक्षक डोक्यावर बर्फाची लादी ठेवल्याप्रमाणे पोंगापंडीत होऊन बसूच कसे शकतात ! ज्यांच्यावर जनतेच्या मालमत्तेचे आणि जीवीताची रक्षण करण्याचे जबाबदारी आहे. तेच जर असे पोंगापंडीत होऊन बसणार असतील तर परमेश्वरसुध्दा धुळ्याचे कल्याण करु शकणार नाही. धुळ्याचे सचिन वाझे कोण ? असा प्रश्न ज्यांना सतावतोय आता त्यांचीच जबाबदारी आहे की सचिन वाझे तर मी उघडा केला आता तुम्ही नागडा कधी करणार ते सांगा!, असे धुळ्याचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.