जळगाव (प्रतिनिधी) : जून्या भांडणातून जयदिप देविदास कोळी (वय २७, रा. राजाराम नगर, कानळदा रोड) यांच्या कुटुंबियांना लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना दि. २५ रोजी रात्री ८ वाजता राजाराम नगरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कानळदा रोडवरील राजाराम नगरात जयदिप कोळी हा तरुण वास्तव्यास आहे. दि. २५ रोजी सकाळी त्यांचे संशयित सुनिल कोळी यांच्यासोबत भांडण झाले. याच भांडणाचा राग मनात ठेवत राजदिप कौही यांना लोखंडी रॉडने मारहाण केली. तसेच त्याची आई व पत्नीला देखील चापटा बुक्क्यांनी मारहाण करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, जयदिप कोळी याने तालुका पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ धनराज पाटील करीत आहे.