जळगाव (प्रतिनिधी) आज जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्र प्रल्हादराव पाटील यांच्या नेतृत्वात प्रांत अधिकारी भारदे यांची भेट घेऊन जळगाव जिल्ह्यात अनेक तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झालं असून शासनाने सर्वेक्षण करून, आपत्ती व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक सहायता त्वरित जाहीर करावी व त्यासाठी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करून मदत करावी, अशी मागणी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे करण्यात आली आहे.
यावेळी जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्र प्रल्हादराव पाटील, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. वंदनाताई चौधरी, सौ. शक्तीला तडवी, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अशोक पाटील, अरविंद मानकरी, जयश्री उमेश पाटील आदी उपस्थित होते.