नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात दिवसागणिक नव्या कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी नवनवे उच्चांक गाठत आहे. दुसऱ्या लाटेमुळे मृत्यूदरातही वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३६४५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, २,६९,५०७ रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ६९ हजार ५०७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला ३० लाख ८४ हजार ८१४ अॅक्टिव्ह रुग्ण असून १५ कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे.
राज्यात ६३,३०९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, ६११८१ रुग्ण बरे होऊन घरी
राज्यात काल (बुधवारी) राज्यात ६३,३०९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान, ६११८१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण ३७,३०,७२९ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल सर्वाधिक ९८५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २६५२७८६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४४७३३९४ (१६.८६टक्के) नमुने पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४२,०३,५४७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ३१,१५९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.