पारोळा (प्रतिनिधी) भिवंडीहून नागपुर जाणाऱ्या कंटेनरमधून तब्बल साडेचार लाखाचे मोबाईल लंपास केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात नसिमोद्दीन बोहोउद्दीन खान (वय ५१ रा. बडनेर गंगाई जि. अमरावती) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास मी भिवंडीहून नागपुर जाण्यासाठी गाडी (क्र. MH-४८ AG-७२०८) टाटा कंपनिची अट्रा कंटेनरमध्ये जिओ कंपनीचे ८ बॉक्स एका बॉक्समध्ये १० नग असे ८० मोबाईल घेऊन निघालो होतो. दि.१३ फेब्रुवारी रोजी सकाळी ४:४५ वाजेच्या सुमारास तुराटखेडा मरटखेडा गावाच्या शिवारात इंद्रदेव महाराज मठाच्या अलिकडे भारत पेट्टोलपंपवार अज्ञात चोरट्यांनी ४ लाख ५५ हजार ४४० रुपये किंमतीचे जिओ कंपनीचे जिओ फोन चोरून नेले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोना सुनिल वानखेडे हे करीत आहेत.