धरणगाव (प्रतिनिधी) शहरात सुरु असलेली भीषण पाणी टंचाई लक्षात घेता स्व. वैशाली सुनील महाले यांच्या स्मरणार्थ कमल जिनिगचे संचालक पवन महाले, हर्षल महाले, निलेश महाले यांच्या परीवाराकडून मराठे गल्लीत टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे.
धरणगावात सध्या १५ ते २० नंतर पाणी पुरवठा सुरु आहे. जास्त दिवस पाणी साठवण करुन ठेवले तर त्यात अळ्या कीडे निर्माण होतात. त्यामुळे साठवण करुन ठेवणं ही कठीण समस्या आहे. तशात उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिकांचे होणार हाल लक्षात घेता घेता स्व. वैशाली सुनील महाले यांच्या स्मरणार्थ कमल जिनिगचे संचालक पवन महाले, हर्षल महाले, निलेश महाले यांच्या परीवाराकडून मराठे गल्लीत टँकरने मोफत पाणीपुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.