मुंबई (वृत्तसंस्था) लोक आपल्या क्षमतेनुसार विविध ठिकाणी गुंतवणूक (Investment) करत असतात. काही जण जास्त परताव्यासाठी जोखीम घेत गुंतवणूक करतात. त्या तुलनेत बहुतांश जण जोखीम न घेता सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देतात. त्यासाठी पोस्ट ऑफिस (Post Office) हा उत्तम पर्याय आहे. आज आम्ही तुम्हाला पोस्टांच्या अशाच एका स्कीम बद्दल सांगणारा आहोत. ज्यात धोका नगण्य असून परतावा चांगला आहे. त्या स्कीमच नाव आहे पोस्ट ऑफिस पब्लिक प्रॉव्हिडंट फंड.
अतिशय लोकप्रिय योजना
ही योजना खूप लोकप्रिय आहे. विशेषतः सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना मध्यमवर्गीयांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्याचबरोबर अनेक नेत्यांनीही यात गुंतवणूक केली आहे. विशेष बाब म्हणजे या योजनेत अगदी माफक गुंतवणुकीवरही दीर्घ मुदतीत लाखो रुपयांचा परतावा मिळू शकतो. यासाठी तुम्हाला दररोज फक्त १५० रुपये गुंतवावे लागतील.
या खात्याचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्षांचा असला, तरी तुम्ही तो ५-५ वर्षांसाठी दोनदा वाढवता येतो. यासोबतच तुम्हाला या स्कीमसह कर सूटही मिळते. या योजनेत तुम्हाला वार्षिक ७.१ टक्के व्याज मिळते आणि यामुळे तुम्हाला दरवर्षी चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.
अशा प्रकारे २० लाख रुपयांचा निधी होईल तयार
जर तुमचे वय २५ वर्षे असेल तर लहान रकमेमध्ये मोठा परतावा मिळवण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुमचे उत्पन्न ३०-३५ हजार रुपयांपर्यंत असेल, तर इतर कोणत्याही बचतीव्यतिरिक्त, सुरुवातीला तुम्ही दररोज १००-१५० रुपये वाचवू शकता. ही बचत तुम्हाला ४५ व्या वर्षी २० लाख रुपयांपेक्षा जास्त अतिरिक्त परतावा देऊ शकते, ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोठ्या गरजा सहज पूर्ण करू शकता.
गणित समजून घ्या
जर तुम्ही पीपीएफमध्ये दररोज १५० रुपयांची बचत केली तर ते मासिक ४५०० रुपये होईल.
दरमहा ४५०० रुपये गुंतवल्यास वार्षिक गुंतवणूक ५४ हजार रुपये होईल.
२० वर्षात एकूण गुंतवणूक १०.८० लाख रुपये असेल.
वार्षिक 7.1 टक्के चक्रवाढीच्या दृष्टीने, यामध्ये, तुमचा निधी २० वर्षात २० लाखांपेक्षा जास्त तयार होईल.
पीपीएफमध्ये कर लाभ
PPF योजनेचा सर्वात मोठा फायदा हा आहे की ते आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर लाभ प्रदान करते. यामध्ये योजनेतील १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट घेता येते. पीपीएफमध्ये मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम देखील करमुक्त आहे.
अशा प्रकारे, पीपीएफमधील गुंतवणूक ‘ईईई’ श्रेणीत येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारचे या योजनांना संरक्षण असते. त्यामुळे गुंतवणूकदारांना सुरक्षेची हमी असते.