पाळधी बु. धरणगाव (प्रतिनिधी) येथून जवळच असलेल्या खेडी-कढोली ते टाकरखेडा येथे शेतरस्त्याची वादाची समस्या निर्माण झाली होती. याची माहिती मिळताच पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे वादाचे निवारण करण्यासाठी थेट बांधावर पोहचले.
पाळधी बु येथील शेतरस्ता खेडी कडोली ते टाकरखेडा येथे शेतकरी विजय पाटील, सतिश पाटील, अशोक पाटील, प्रकाश पाटील, कृष्ण पाटील, गुलाब पाटील, शामराव पाटील, बाळासाहेब पाटील, भुषण पाटील याच्या शेतरस्ता वादाची समस्या निर्माण झाली होती. याची माहिती पाणीपुरवठा तथा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना कळताच ते वादाचे निवारण करण्यासाठी स्वतः शेतीच्या बांधावर पोहचले. आणि रस्त्याचा वाद मिटविला. यावेळी उपस्थित गावातील प्रगतशील शेतकरी देविदास आण्णा पाटील, अशोक आबा पाटील, सतीश पाटील, विजू बापू पाटील, अशोक पाटील, दिलीप पाटील, भगवान ठाकरे, बळीराम सपकाळे आदी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या या मध्यस्थीची आज पाळधी बु. परिसरात एकच चर्चा सुरू आहे. पालकमंत्री वाद मिटवण्यासाठी स्वतः शेत बांधावर पोहचल्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावले होते.