धरणगाव (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशातील हाथरस येथील अमानुष घटनेच्या जाहीर निषेर्धात धरणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे आज (दि.७) रोजी तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे एक दलीत मुलीवर चार नराधमांनी अमानुष बलात्कर करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 14 दिवस मुत्युशी झुंझ देत पीडित तरुणी दिल्ली येथे हॉस्पीटलमध्ये मुत्यमुखी पडली. तिच्या आई वडिलांची परवानगी न घेता शासनाने परस्पर अंत्यसंस्कार केला. तरी या चारही आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे व मुख्यमंत्री योगी यांनी त्वरीत यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, असे निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना तालुकाध्यक्ष धनराज माळी, दिपक वाघमारे, माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, युवक अध्यक्ष नाटेश्वर पवार, जिल्हाउपाध्यक्ष ओ. बी. सेलचे अरविंद देवरे, मोहन पाटील, युवक शहराध्यक्ष संभाजी कंखरे, संजय पाटील पिंपळे, ओ. बो. सेल तालुकाध्यक्ष अनिल पाटील, बाजार समिती संचालक रंगनाथ सांवत, सिमा नेहते, माजी महिला अध्यक्ष उत्तम भदाणे, नारायण चौधरी, राजु वाणी, किरण पाटील, घनश्याम पाटील, राजु कोळी, प्रमोद जगताप, नदिम काझी , संजय पाटील भोणे, दिपक भोई, भुषण पाटिल, सिताराम मराठे, आफ्रोज पटेल, प्रशांत बच्छाव ,नाना बडगुजर, बिसम्मोदिन दादा, गिरीष पाटिल, साईनाथ पाटिल, आदि पदाधिकारी उपस्थित होते.