TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिंदू कोड बिल… डॉ. आंबेडकरांनी स्त्रियांचा प्रगतीसाठी निर्माण केलेला प्रगतीचा मार्ग

The Clear News Desk by The Clear News Desk
September 28, 2021
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (व्ही.टी. माळी) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातुन तमाम भारतीयांना ज्याप्रमाणे मुलभुत हक व अधिकार मिळुन दिलेत. त्याचप्रमाणे हजारो वर्षापासून व्यवस्थेमध्ये खितपत पडलेल्या स्त्रियांचा उद्धारासाठी त्यांचे महत्वाचे योगदान आहे. स्त्रियांना सुद्धा पुरुषाप्रमाणे स्वांतत्र्य पुरक, सन्मानाचे जिवन जगता यायला पाहिजे, म्हणुन ‘स्त्रियांसाठी संविधानामध्ये कलम १४ नुसार महिला विषयी लिंगभेदभाव नष्ट करण्याचे प्रायोजन केले होते.

कलम १६ नुसार ‘स्त्रियांना नौकरी करण्याचे. कलम २१ व २२नुसार, स्त्रियांनी स्वतःचे जीवन स्व: इच्छेप्रमाणे जगण्याचे अधिकार. कलम २५नुसार धार्मिक सामाजिक स्वातत्र्य, असे बहुमोल अधिकार अर्पण केलेत. परंतु सामाजिक व धार्मिक जिवनात स्त्रियांची अवस्था दयनिय होती. स्त्रियांना स्वतःचे आस्तित्व नव्हते. अनेक अनिष्ठ परंपरांचा माध्यमातुन शोषण करून दुयम स्थान दिले जात होते.

READ ALSO

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

पुरुषा प्रमाणे त्यांना पण स्वतंत्र जीवन जगता यावे, तसेच समाजामध्ये त्यांना मानसन्मान मिळावा. हजारो वर्षाचा गुलामीचा दास्यातुन मुकतता व्हावी. त्यांचे जीवनमान बदलावे. म्हणुन डॉ. बाबा साहेबांनी प्रांतिक मंत्रिमंडळामध्ये कायदेमंत्री बनले तेव्हा पासुन त्यांनी स्त्रियांचा प्रश्नाविषयी तकालीन प्रातिंक मंत्रिमंडळामध्ये आवाज उठवायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हिंदु कोड बिल समिती बनविली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे “देशाची प्रगती ही महिलांचा समाजामधील दर्जा वरून मोजली जाते” परंतु, हिंदू ‘स्त्रियांची अवस्था भयानक दयानिय होती. म्हणुन त्यांनी हिंदू कोड बिलचा माध्यमातुन स्त्रियांचा उत्थानासाठी धाडसी पाऊल उचलले ते म्हणजे हिंदू कोड बिल.

हिंदू कोड बिलमध्ये ४ महत्वाचे कायदे निर्मिती होती १) पितृसत्ताक संपत्तीमध्ये मुलींना समान वाटा. २)वारस निवड -अपत्य हिन स्त्रियांना आपला वारस स्वःता निवड करावी (संपती व पालन पोषण). ३) घटस्फोट- हिंदू चालीरिती नुसार स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार नव्हता, पुर्न विवाह करण्याचा अधिकार नव्हता. ४) सतिप्रथा विरोध – पुर्वी पतीचे निधन झाले की पत्नीला जीवंतपणी त्याचा सोबत मरण पत्करावे लागे. हे हिंदू कोड बिलाचे महत्वाचे कायद्याचे प्रावधान होते.

हिंदू कोड बिलनुसार मुस्लीम धर्मीय सोडुन तमाम हिंदू संस्कृतीशी निगडीत (बौद्ध, जैन, शीख. लिंगायत. धर्मातंरीत खिश्चन) स्त्रियांसाठी होता. या बिलाचा कायदयानुसार स्त्रियांचा “दर्जा”मध्ये क्रांतिकारक बदल होणार होता. परंतु संसदेमध्येच संसदेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनीच विरोध केला. यावरून विरोध किती प्रखर असेल याची जाणीव होते. सनातन्यांनी तर देशभर आक्रव तांडव सुरू केले. देशभर बिल विरूध्द उग्र आंदोलन करून उच्च वर्गीय माहिलांनीही विरोध केला. पंरतु बाबासाहेब आपल्या क्रांतिकारी निर्णयावर ठाम होते. त्यांनी त्या काळच्या नेत्यांना खुप समजावले.

२६ सप्टेंबर १९५१ मध्ये संसदेत डॉ. आंबेडकर यांनी बिलाचा समर्थनार्थ ऐतिहासिक भाषण केले. पण त्यांचे प्रयत्न व्यर्थ ठरले. शेवटी हे बिल स्थगित ठेवण्यात आले. दुसऱ्याच दिवशी २७ तारखेला “हिंदू कोड बिल”साठी त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. पुढे १९५५-५६ मध्ये प्रधानमंत्री नेहरू यांचा अध्यक्षतेखाली हे बिल तत्वतः संसदेत मंजुर करण्यात आले.

आज स्त्रियांना पुरूषांना बरोबरीचे हक्क व अधिकार प्राप्त झाले आहेत. सर्व क्षेत्रामध्ये ‘स्त्रियांनी गगनभरारी घेतली आहे, याचा मागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा दिर्घकालीन खुप मोठा संघर्ष आहे.

व्ही.टी. माळी
महात्मा फुले हायस्कुल, धरणगाव
मो. नं. 8888992668

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

“रयतेच्या मनात कोरलेले इतिहासातील स्वर्णिम पान म्हणजे शिवराय”- व्याख्याते लक्ष्मणराव पाटील

March 8, 2026
गुन्हे

नवीन बायपासवर तीन वाहनांचा विचित्र अपघात

February 28, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
धरणगाव

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरच्या जामीन अर्जावर सुनवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव पालिकेच्या प्रभाग रचनेवर माजी नगरसेवक हाजी शेख इब्राहीम यांची हरकत !

May 13, 2022

रॅम व स्पीड ब्रेकर न टाकल्यास मंगळवारी ‘रस्ता रोको आंदोलन’ ; नागरिकांची प्रशासनाला नोटीस

December 19, 2021

रेड लाईट डायरीज – लॉकडाऊनच्या वेदना : पुणे ते मेलबर्न !

September 17, 2020

TET Exam Scam : जळगाव जिल्‍ह्यात एकूण १३८ बोगस शिक्षकांचे पगार बंद ; जाणून घ्या…संपूर्ण यादी !

August 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group