जामनेर (प्रतिनिधी) छत्रपती संभाजीनगर कडून नेपानगरकडे जाणाऱ्या मालवाहु पिकअपची भुसावळकडून संभाजीनगरकडे जाणाऱ्या डाक पार्सलच्या कंटेनरला जोरदार धडक बसली. सोमवारी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात मालवाहू पिकअप मधील चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला.
अल्लाउद्दीन गयासोद्दीन शेख (४०), शेख समीर शेख नजीर (२०, दोघे रा. बालानगर, ता. पैठण) आणि वाहनचालक साजन जगन बडोले (२५, रा. खंडवा, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. ते बालानगर येथून फळांच्या खरेदीसाठी खंडव्याकडे जात होते. रात्री नातेवाईक जामनेरला पोहोचले. भुसावळकडून डाक पार्सल घेऊन (आर.जे ३२, जी.सी ०७८९) या क्रमांकाचा कंटेनर छत्रपती संभाजी नगरकडे जात होता. याचवेळी (एमएच २० डीइ ५५४८) समोरून भरधाव वेगाने पहूर कडून जामनेरकडे येत होती.
यावेळी शेतकरी सहकारी जिनिंग समोरील वळणावर मालवाहू पिकअप नियंत्रित न करता आल्याने कंटेनरला धडकली.
या धडकेत मालवाहू पिकअपमध्ये समोर बसलेल्या चालकासह तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच नागरिकांसह वाहनचालकांनी भाव घेत शर्तीचे प्रयत्न करून पिकअप मधील तिघांचे मृतदेह बाहेर काडून जामनेर उपजिल्हा रुग्णालयात आणले.