सांगली (वृत्तसंस्था) ब्लड प्रेशर वाढतं आणि डायबिटीसचा त्रास मागे लावून घ्यायचा नव्हता म्हणून मी आता गृहमंत्री पद स्वीकारले नाही. अजित दादांनी मी गृहमंत्री पद न घेण्याबाबत जे काही माझ्या बाबतीत सांगितले ते खरंच आहे, याची कबुली जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. सांगलीतील पोलीस मुख्यालयातील नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
गृहमंत्री झाल्यावर ब्लडप्रेशर आणि शुगरचा त्रास सुरू होतो, हे आपणाला आर आर आबा पाटील यांनी सांगितले होते, आणि गृहमंत्री झाल्यानंतर आपल्याला ब्लड प्रेशरचा त्रास सुरू झाला. त्यांनतर आपण शुगर मागे लागू नये,अशी भूमिका घेतली असा खुलासा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आता ज्यादा अधिकार देण्या बरोबर त्यांच्यावरील तणाव कमी करण्याचे प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मतही मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
काय म्हणाले होते अजित पवार ?
गृहखात्याच्या जबाबदारीवरून अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात जोरदार टोलेबाजी केली.यावेळी बोलत असताना अजितदादांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी कशा प्रकारे टाळली असा किस्साच सांगून टाकला. ‘गृहखातं देत असताना अनेकांना विचारलं. त्यात जयंत पाटलांना साद घातली. पण गृहमंत्रिपद म्हटलं कि माझा बीपी वाढतो. त्यानंतर ह जयंत पाटलांनी जबाबदारी ढकलली. नंतर ही जबाबदारी वळसे पाटलांनी स्वीकारलीत. आपल्याला अशा व्याधी होऊ नये म्हणजे बरं. असं म्हणत गृहमंत्रिपदावरून वळसेपाटलांसमोरच अजित पवारांची फटकेबाजी केली.