TheClearNews.Com
Monday, June 23, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आदित्यनाथ पंतप्रधान झाले तर देशातील धार्मिक एकता धोक्यात येईल : इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा

The Clear News Desk by The Clear News Desk
February 16, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधान झाल्यास देशातील धार्मिक एकता धोक्यात येईल. अशी भीती प्रसिद्ध लेखक आणि इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. गुहा यांनी टेलिग्राफ इंडियासाठी लिहिलेल्या एका लेखामध्ये योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान झाल्यास काय होईल यासंदर्भात भाष्य केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सध्याचे गृहमंत्री अमित शाह हे पंतप्रधान पदाचा दावेदार असण्याची शक्यता कमी असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे पंतप्रधानपदी विराजमान होण्याची अधिक शक्यता असल्याचे मत प्रसिद्ध लेखक आणि इतिहासतज्ञ रामचंद्र गुहा यांनी व्यक्त केलं आहे. गुहा यांनी टेलिग्राफ इंडियासाठी लिहिलेल्या एका लेखामध्ये योगी आदित्यनाथ देशाचे पंतप्रधान झाल्यास काय होईल यासंदर्भात भाष्य केलं आहे. या लेखामध्ये गुहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सध्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी असणाऱ्या योगी आदित्यनाथ यांच्यामधील साम्य आणि फरक यावर बोलताना मोदींपेक्षा योगींचे नेतृत्व देशातील सामाजिक एकता बिघडवण्याचं काम करेल अशी भीती व्यक्त केली आहे.

READ ALSO

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

रामचंद्र गुहा यांनी, वेटींग इन विंग्स म्हणजेच भरारी घेण्यास तयार असणारा पक्षी अशा अर्थाचा एक लेख लिहिला असून यामध्ये त्यांनी योगी पंतप्रधान झाल्यास देशातील धार्मिक एकताही धोक्यात येईल असं म्हटलं आहे. लेखाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदींचे निकटवर्तीय असणारे अमित शाह हे मोदींचे वारसदार होऊन पंतप्रधानपदाची गादी संभाळतील असं २०१९ पर्यंत सर्वांनाच वाटत होतं असं नमुद केलं आहे. मात्र २०२० च्या शेवट होईपर्यंत योगी आदित्यनाथ हे अधिक जोमाने पुढे आले असून धार्मिक मुद्द्यांसंदर्भातील त्यांच्या धोरणांंची अंमलबाजवणी कर्नाटक आणि मध्य प्रदेशसारख्या भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यातील मुख्यमंत्र्याकडूनही नवीन कायदा लागू करुन केली जात आहे. हे एकप्रकारे योगी आदित्यनाथ यांचं नेतृत्व येडियुरप्पा आणि शिवराज सिंह चौहान यांच्यासारख्या नेत्यांनी मान्य केल्यासारखं असल्याचं मत गुहा यांनी व्यक्त केलं आहे. राजकारणामध्ये टीकून राहण्यासाठी योगींप्रमाणेच टोकाचं राजकारण करणं काळाची गरज असल्याचं या नेत्यांना कळालं आहे, असंही या लेखात म्हटलं आहे.

याच लेखामध्ये मोदी आणि योगीमध्ये फरकही असल्याचं गुहा यांनी म्हटलं आहे. मोदी किमान सबका साथ सबका विकास असं म्हणतात, मेट्रोत एखाद्या मुस्लिमासोबत फोटो तरी काढतात. मात्र योगी असलं काही करत नाहीत. हिंदू हे इतर कोणत्याही धर्मावर श्रद्धा असणाऱ्या आणि खास करुन मुस्लीमांपेक्षा वरचढ आहेत असं योगी समजतात, असा उल्लेख या लेखात आहे. योगी यांनी हिंदू युवा वाहिनी नावाची संघटना स्थापन केली असून हिंका, दंगल आणि इतर प्रकरणांमध्ये या संघटनेविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. आज योगी मुख्यमंत्री झाल्यानंतरही ही संघटना कार्यरत आहे, असं गुहा यांनी म्हटलं आहे. अशाप्रकारे एखादी हिंदुत्वावादी संघटना स्थापन करुन मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचलेले योगी एकमेव नेते असल्याचं गुहा सांगतात.

देशामध्ये अधिक शक्तीशाली होणं हेच योगींच एकमेव ध्येय

पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी जगभारतील अनेक देशांमध्ये दौरे करुन तेथील नेत्यांना भारताकडे आर्षित करण्याचा प्रयत्न केला. यात त्यांना संमिश्र यश मिळालं. मात्र योगी अदित्यनाथ पंतप्रधान झालेत तर जगातील इतर देश त्यांच्याबद्दल आणि भारताबद्दल काय विचार करतात याबद्दल त्यांना फारशी चिंता नसेल. देशामध्ये आपण अधिक शक्तीशाली होणं हेच त्यांचं एकमेव ध्येय असेल. खास करुन राजकीय, वैचारिक आणि धार्मिक मतांशी आपल्याशी सहमत नसणाऱ्यांविरोधात शक्तीप्रदर्शन करण्याचा त्यांचा विचार असेल असं गुहा म्हणतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

“आमदार मंगेश चव्हाण यांनी राबविलेली रायगड मोहीम हे युवापिढीला शिवसंस्कार देणारे अद्वितीय कार्य ” – उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे

June 11, 2025
गुन्हे

नोकरीचा बहाणा ; दीड कोटीचा चुना !

May 31, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
जळगाव

जलसंधारणासाठी कटीबद्ध राहूया- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

March 21, 2025
जिल्हा प्रशासन

राज्यातील बसस्थानक अत्याधुनिक सेवा सुविधायुक्त करणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

March 18, 2025
राजकीय

विधान परिषदेत प्रकल्पग्रस्तांच्या नोकरभरतीचा मुद्दा गाजला – आ. एकनाथ खडसेंनी सरकारला धोरण बदलण्याची मागणी केली

March 11, 2025
Next Post

लग्न समारंभ, आठवडे बाजार, गर्दीच्या कार्यक्रमांवर असणार मनपाची नजर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाटणादेवीच्या जंगलात हातपाय बांधून एकाचा धारदार शस्त्राने खून !

October 7, 2021

एमएस धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवली !

August 6, 2021

भुसावळच्या महिलेची १० लाखांची फसवणूक ; मयत पतीच्या विमा पॉलिसीचे पैसे एजंटने परस्पर लाटले !

June 29, 2024

पोहरादेवी येथील गर्दीबाबत कारवाई होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

February 24, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group