नवी दिल्ली (वृत्तसंस्था) रोजगारासारख्या मुळ मुद्द्यांऐवजी सोशल मीडिया आणि खोट्या बातम्यांच्या आधारे तरुणांना दुसरीकडे अडकवून ठेवता येईल मात्र हे फार काळ काम करणार नाही. भारतामध्ये वेळीच रोजगार निर्मिती झाली नाही तर देशातील तरुण रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील, असा इशारा रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर असलेल्या रघुराम राजन यांनी मोदी सरकारला दिला आहे.
देशातील तरुणांना रोजगार हवा आहे. रोजगारासारख्या मुळ मुद्द्यांऐवजी सोशल मीडिया आणि खोट्या बातम्यांच्या आधारे त्यांना दुसरीकडे अडकवून ठेवता येईल मात्र हे फार काळ काम करणार नाही. रोजगार नसणाऱ्या तरुणांना काही काळ कोणत्या ना कोणत्या गोष्टींकडे आकर्षित करता येईल, मात्र ते अधिक काळ टीकवता येणार नाही. वेळीच रोजगार निर्मिती केली नाही तर तरुण रस्त्यावर उतरतील. त्यांचे मूळ मुद्द्यांपासून त्यांना विचलित करण्यासाठी सोशल नेटवर्किंग आणि खोट्या बातम्यांचा वापर मर्यादित कालावधीसाठी केला तरी नंतर ते फारसे प्रभावी ठरणार नाही, असेही राजन यांनी म्हटले आहे. राजन हे भवन्सच्या एसपी जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चने आयोजित केलेल्या सेंटर फॉर फायनॅनशियल स्टडिजच्या विद्यार्थ्यांसाठीच्या वेबिनारमध्ये बोलत होते.